गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

केवळ धामी आणि चेन्नीच नाही, या मुख्यमंत्र्यांनाही करावा लागला आहे पराभवाचा सामना; बघा कोण कोण आहेत त्यात?

by Gautam Sancheti
मार्च 11, 2022 | 11:27 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
election 2

 

मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
देशभरातील कोणत्याही राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर होते. तेव्हा विद्यमान मुख्यमंत्री यांची त्या निवडणुकीत कसोटी लागते. कारण त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा कामाची जणू काही परीक्षाच असते. सुमारे पाच वर्षात जनतेसाठी कामे केली तर ते मुख्यमंत्री निश्चितपणे निवडून येतात. परंतु नागरिकांचा रोष असेल किंवा जनभावना त्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात असेल तर त्यांना पराभवाला देखील सामोरे जावे लागते. सध्या पाच राज्यातील निवडणुका झाल्या असून काही विद्यमान मुख्यमंत्री आणि अनेक माजी मुख्यमंत्र्यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले. यापूर्वीदेखील देशभरातील अनेक राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये तत्कालीन विद्यमान मुख्यमंत्री यांना पराभवाचा सामना करावा लागला होता, असे दिसून येते.

उत्तराखंडमध्ये भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करत आहे. मात्र, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी येथून निवडणूक हरले आहेत. या जागेवर काँग्रेसचे उमेदवार भुवनचंद कापरी यांनी त्यांचा जवळपास पाच हजार मतांनी पराभव केला. यासोबतच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचाही निवडणुकीत पराभव झाला आहे. चन्नी पंजाबमधील दोन विधानसभा जागांवरून निवडणूक लढवत होते आणि दोन्ही जागांवरून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विद्यमान मुख्यमंत्री निवडणुकीत पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक राज्यांचे मुख्यमंत्री विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत.

ममता बॅनर्जी
मार्च २०२१ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदारसंघातून पराभव झाला होता. तथापि, त्यांची पारंपारिक विधानसभा जागा भाबनीपूर होती, जिथून त्यांनी २०१६ मध्ये निवडणूक लढवली आणि ती जिंकली. मात्र नंदीग्राममधून भारतीय जनता पक्षाचे शुभेंदू अधिकारी यांना त्यांच्याच घरात आव्हान देण्यासाठी त्या निवडणूक लढवण्यासाठी गेल्या होत्या. जिथे त्यांना १७०० मतांनी पराभव स्वीकारावा लागला.
सिद्धरामय्या
सन २०१८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सिद्धरामय्या यांनाही निवडणूक पराभवाला सामोरे जावे लागले होते. सिद्धरामय्या यांनी दोन जागांवर निवडणूक लढवली होती, त्यात एका जागेवर त्यांचा पराभव झाला. चामुंडेश्वरीमध्ये त्यांचा ३६,०४२ मतांनी पराभव झाला. पण बदामीची जागा केवळ १,६९६ मतांनी निश्चितपणे जिंकली होती.

हरीश रावत
हरीश रावत हे २०१४ ते २०१७ पर्यंत उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. सन २०१४ मध्ये धारचुला विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून रावत मुख्यमंत्री बनले. २०१७ च्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत त्यांनी दोन जागांवर निवडणूक लढवली आणि दोन्ही जागांवर त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
रघुवर दास 
सन २०१९च्या झारखंड विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री रघुवर दास यांचा येथे पराभव झाला. त्यांनी जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. रघुवर दास यांचा माजी मंत्री आणि अपक्ष उमेदवार सरयू राय यांनी १५ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.
प्रेमकुमार धुमल
यापूर्वी हिमाचलचे मुख्यमंत्री असलेले प्रेम कुमार धुमल हे देखील मुख्यमंत्री म्हणून निवडणूक हरलेल्या व्यक्तींमध्ये आहेत. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा पराभव झाला होता. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांना सुजानपूर मतदारसंघातून पराभवाला सामोरे जावे लागले. माजी मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसचे प्रतिस्पर्धी राजेंद्र सिंह राणा यांनी जवळपास ३,५०० मतांनी पराभव केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अॅल्युमिनिअमच्या किंमतीही सर्वोच्च पातळीवर; हे आहे कारण

Next Post

देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिले हे खुले आव्हान

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तान क्रिकेट संघाने थेट आशिया कपमधून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय

सप्टेंबर 17, 2025
Untitled 23
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये महाराष्ट्र चेंबरतर्फे शनिवारी शासकीय योजना आणि व्यवसायाच्या संधी विषयावर सेमिनार…

सप्टेंबर 17, 2025
mukt
संमिश्र वार्ता

महाज्ञानदीप’ पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू

सप्टेंबर 17, 2025
crime 88
क्राईम डायरी

दुमजली माडीचे कौले काढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 17, 2025
accident 11
क्राईम डायरी

गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून दांम्पत्य पडले…६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 17, 2025
crime114
क्राईम डायरी

कर्जदारास बंदुकीचा धाक दाखवून सावकाराने केले अपहरण…व्याजासह मुद्दल परत करुनही घडला प्रकार

सप्टेंबर 17, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
संमिश्र वार्ता

राज ठाकरे यांनी अमित शाह, जय शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून केला हल्लाबोल…

सप्टेंबर 17, 2025
e vidhya 1024x275 1 e1758078658915
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या

सप्टेंबर 17, 2025
Next Post
संग्रहित छायाचित्र

देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिले हे खुले आव्हान

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011