शनिवार, ऑगस्ट 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

CBSE : १०वी व १२वीच्या परीक्षांची घोषणा; या महिन्यात होणार

by Gautam Sancheti
जानेवारी 1, 2021 | 5:35 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
CBSE e1658468165387

नवी दिल्ली – केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (CBSE)च्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या लेखी परीक्षा ४ मे पासून सुरू होणार असून त्या १० जूनपर्यंत संपतील. तर १ मार्च पासून प्रॅक्टीकल परिक्षा सुरू होतील, अशी घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. तसेच, १५ जुलैला या परीक्षांचा निकाल लागेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्यासाठी त्यांनी ऑनलाईन संवाद साधला. तारखा जाहिर झाल्याने शिक्षक, विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यापुढील काळात परीक्षांचे योग्य नियोजन आणि त्यादृष्टीने अभ्यास करणे विद्यार्थ्यांना शक्य होणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणार नाहीत.

कोरोनामुळे सध्या ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत. दरवर्षी या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात होतात. यंदाही तेव्हाच कशा घेतल्या जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. तसेच, पालकांनी त्यास विरोध केला होता. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी बोर्डाचे शिक्षक तसेच पालक यांच्याशी चर्चा केली. त्यांची मते जाणून घेतली. यासंदर्भात ३१ डिसेंबर रोजीच परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्याचे शिक्षण मंत्र्यांनी जाहिर केले होते.

शिक्षणमंत्र्यांकडून कौतुक

शिक्षणमंत्री पोखरियाल म्हणाले की, कोरोना काळाचे मोठे आव्हान होते. मात्र, विद्यार्थी, शिक्षक, पालक या सर्वांनीच या आव्हानाला तोंड दिले. ऑनलाईन शिक्षण देणे किंवा घेणे हे एवढे सोपे नव्हते. सर्वांच्या अथक प्रयत्नामुळेच हे शक्य झाले. मी सर्वांचे आभार मानतो. वारंवार संवाद केल्यानेच हे यश आले आहे. विद्यार्थ्यांच्या संयमालाही महत्व द्यायला हवे. कुणीही खचले नाही. सर्व जण सकारात्मक आहेत. जग किंवा काही देश विचारही करु शकत नाही, असे काम कोरोना काळात विद्याद्यानाचे आपण करुन दाखविले आहे. जे व्यक्ती ऑनलाईन शिक्षण घेऊ शकत नाही. त्यांच्यासाठी आपण व्यवस्था केली. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले, असेही पोखरियाल म्हणाले. सर्व जण एकत्र आले आणि एका ध्येयाने आपण प्रयत्न केल्याने हे यश आले. जेईई आणि नीटच्या परीक्षा शांततेत आणि सुरक्षेत संपन्न झाल्या. ही सुद्धा एक मोठी बाब आहे, असेही त्यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नायलॉन मांजा बंदी – राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे पोलिस आयुक्तांना निवेदन

Next Post

मालेगाव -चोंडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध, नऊ जण आले निवडून

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20201231 WA0010 1

मालेगाव -चोंडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध, नऊ जण आले निवडून

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी मतभेदांचे प्रसंग टाळावे, जाणून घ्या, शनिवार, ९ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 8, 2025
IMG 20250808 WA0420 1

अपघातग्रस्त शाळकरी विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले शालेय शिक्षण मंत्री

ऑगस्ट 8, 2025
IMG 20250808 WA0425 2

महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुरक्षित, एकाचा शोध सुरू. उत्तरकाशीत अडकलेल्या पर्यटकांशी मंत्री गिरीश महाजन यांचा संवाद

ऑगस्ट 8, 2025
IMG 20250808 WA0395 1

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले हे निर्देश

ऑगस्ट 8, 2025
INDIA GOVERMENT

टोमॅटो, कांदा आणि बटाट्याच्या किमती स्थिर राहाव्यात यासाठी केंद्र सरकार सक्रिय…केल्या या उपाययोजना

ऑगस्ट 8, 2025
ग्राम विकास मंत्री व सार्वजनिक आरोग्य मंत्री संयुक्त बैठक 2 1024x682 1 e1754659804441

या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी कार्यवाही करण्याचे मंत्र्यांचे निर्देश…

ऑगस्ट 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011