घोटी – जेष्ठ ग्रामीण साहित्यिक व लेखक पुंजाजी मालुंजकर यांच्या ठिणगी या कथासंग्रहाचे प्रकाशन आमची माती, आमची माणसं कार्यालयात साहित्यिक प्रा. गिरीष पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजकेच मान्यवर उपस्थित होते ,या प्रसंगी लेखक पुंजाजी मालुंजकर , प्रकाशक प्रा. डॉ. संजय जाधव , जेष्ठ पत्रकार ब्रीज परिहार, अँड. ज्ञानेश्वर गुळवे दिनेश भोसले आदि मान्यवर उपस्थित होते.
पुंजाजी मालुंजकर यांचे हे आठवे पुस्तक आहे, ठिणगी कथासंग्रह या पुस्तकात एकुन नऊ दीर्घकथा आहेत. एका ठिणगीमुळे लागणारा वणवा, त्यातून होणारी होरपळ व पर्यावरणाची हानी या ज्वलंत प्रश्नावर उत्तर शोधणारी व एक नवीन सर्व समावेशक पर्याय सूचवीनारी ठिणगी ही अभ्यासपुर्ण कथा वाचावयास मिळेल, तसेच बचतीचे महत्व पटवून देणारी चपलाहार ही कौटुंबिक कथा, बाळाचं गुपीत, असं कसं घडतं ? या गूढ़कथा, जगण्याचं भान शिकविणाऱ्या नवं क्षितिज , परत फिरा हो ! बांडगुळ , यशाचे धनी, आणि पहाटवारा या बोधकथा वाचकाना, आबाल वृध्दाना नक्कीच आवडतील.
मालुंजकर याच्या चैत्रपालवी या कथेवर आधारित एक सिनेमा ही लवकरच येत आहे.या चित्रपटाचा उदघाटनाचा शॉट होलीपूजनाने गडगडसांगवी या निसर्ग रम्य परिसरात घेण्यात आला आहे.