मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृतसेवा
राजपाल यादवची गणना बॉलीवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये केली जाते. तो एक विनोदी कलाकार आहे त्याचा अभिनय पडद्यावर खूपच वेगळा दिसतो. राजपाल यादवने आतापर्यंतच्या बहुतांश चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना खूप हसवले आहे. परंतु एकेकाळी त्याच्याकडे ऑटो रिक्षाला भाडे देण्यासाठी देखील पैसे नव्हते, त्यामुळे तो पायी चालत जात असे.
त्यांचा जन्म 16 मार्च 1971 रोजी उत्तर प्रदेशातील लखनौला लागून असलेल्या शाहजहानपूर जिल्ह्यात झाला. राजपाल यादव याचे शालेय शिक्षण शाहजहांपूर येथून झाले. त्यानंतर तो तिथल्या नाट्यगृहात रुजू झाला. काही काळानंतर राजपाल यादव 1992 मध्ये लखनऊच्या भरतेंदू नाट्य अकादमीत नाट्य प्रशिक्षणासाठी गेला. त्यांनी येथे दोन वर्षे प्रशिक्षण घेतले आणि त्यानंतर 1994 ते 1997 पर्यंत ते दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये राहिला. 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर राजपाल यादव यांनी 1989 ते 1991 या काळात ऑर्डनन्स क्लॉथ फॅक्टरीमध्ये टेलरिंगची अॅप्रेंटिसशिप केली, परंतु कलाकार बनण्याचे त्याचे स्वप्न त्याला दूर ठेवता आले नाही.
राजपाल यादवने सन 1999 मध्ये ‘दिल क्या करे’ मधून बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या. यानंतर राजपाल यादवची खरी ओळख खलनायक बनून झाली. 2000 मध्ये आलेल्या राम गोपाल वर्मा यांच्या ‘जंगल’ चित्रपटात त्यांनी सिप्पाची भूमिका साकारली होती. त्याची भूमिका एका खतरनाक खलनायकाची होती, या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट निगेटिव्ह भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.
यानंतर राजपाल यादव ‘कंपनी’, ‘ तुम मुझसे शादी करोगी, मालामाल विकली, मै मेरी बीबी और वो, ‘अपना सपना मनी मनी’, ‘फिर हेरा फेरी’, ‘चूप’ चुपके’ आणि ‘भूल भुलैया’सह अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये आपला उत्कृष्ट अभिनय दाखवला आहे. आपल्या दमदार अभिनयामुळे राजपाल यादवने फिल्मफेअरसह अनेक पुरस्कार जिंकले आहेत. मात्र राजपाल यादवला बॉलिवूडमध्ये स्थान मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.
एका मुलाखतीत राजपाल यादवने सांगितले की, एक वेळ अशी होती की, बस, रिक्षाचे भाडे भरण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते, पण चित्रपटसृष्टी तील त्याच्या जवळच्या मित्रांनी त्याला खूप पाठिंबा दिला. राजपाल यादव म्हणाले होते, ‘मला वाटते की प्रत्येकाने आपले दरवाजे इतरांसाठी खुले ठेवले पाहिजेत. मित्रांनी मला मदत केली नसती तर मी इथे कसा असतो? संपूर्ण जग माझ्यासोबत आहे, माझा स्वतःवर विश्वास आहे, मला माहित आहे की मला मिळू शकणार्या सर्व समर्थनाची मला गरज आहे.’
एवढेच नाही तर राजपाल यादवने मुंबईतील संघर्षाचे सुरुवातीचे दिवसही आठवले आहेत. तो पुढे म्हणाला होता, ‘मुंबईत आल्यावर नवीन शहर वाटतं. कधी कधी जीवन अवघड वाटत असेल तर उद्देश सोपा होतो. जीवन सोपे वाटले तर उद्देश अवघड होतो.
राजपाल यादवचे पहिले लग्न लखीमपूर येथील करुणा यादवसोबत झाले होते, मात्र आजारपणामुळे तिचे निधन झाले. त्यानंतर त्याने कॅनडात राहणाऱ्या राधा यादवसोबत दुसरे लग्न केले. राजपाल यादवचे दुसरे लग्न लव्ह मॅरेज आहे, दोघेही पहिल्यांदा कॅनडामध्ये भेटले होते आणि काही काळानंतर दोघांनी 2003 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला.