मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आशा पारेख सध्या चित्रपटांपासून दूर आहेत. परंतु त्या पूर्वीच्या काळातील सुपरहिट अभिनेत्रींपैकी एक आहेत. आशा पारेख यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीने तिच्या काळातील जवळपास सर्वच मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले पण धर्मेंद्र आणि आशा पारेख यांनी भारतीय चित्रपटांना अप्रतिम हिट चित्रपट दिले आहेत. रसिकांना त्यांची जोडी खूप आवडली. धर्मेंद्र आणि आशा पारेख यांनी ‘आये दिन बहार के’ चित्रपटात एकत्र काम केले होते आणि या चित्रपटशी संबंधित एक अतिशय मनोरंजक किस्सा घडला होता.
साधारणतः ही गोष्ट 1965 सालची आहे, जेव्हा आशा पारेख आणि धर्मेंद्र दार्जिलिंगमध्ये ‘आये दिन बहार के’ चित्रपटाचे शूटिंग करत होते. तेव्हा एवढी थंडी होती की, डायरेक्टरच्या पॅक-अपवर बोलायचे आणि तिथे दारूच्या बाटल्या उघडल्या जायच्या. चित्रपटाचे दिग्दर्शक धर्मेंद्र आणि टीमचे इतर सदस्य रात्रभर दारू पिऊन बसायचे.
धर्मेंद्र इतके दारू प्यायचे की सकाळपर्यंत त्यांच्या तोंडातून दारूचा वास जात नव्हता. धर्मेंद्र यांना आशा पारेख यांच्यासोबत शूटिंग करायचे, तेव्हा कांदा खायचे. अभिनेत्रीने एक-दोन दिवस दुर्गंधीकडे दुर्लक्ष केले. मात्र तिसऱ्या दिवशी त्या थेट दिग्दर्शकाकडे गेल्या आणि चित्रपटाचे शूटिंग करणार नसल्याचे सांगितले. आशाजींनी दिग्दर्शकाला सांगितले की, धर्मेंद्रच्या तोंडाला कांद्याचा वास येत आहे आणि अशा परिस्थितीत मी शूटिंग करू शकणार नाही.
धर्मेंद्र यांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी आशा पारेखजींना सांगितले की, दारूचा वास लपविण्यासाठी मी कांदा खातो. धर्मेंद्रच्या या बोलण्यावर अभिनेत्री म्हणाली की, तुम्ही दारू पिणे बंद करा. तेव्हा धरमजी यांनी आशाजीला वचन देले की, मी आजपासून सेटवर कधीही दारू पिणार नाही. त्यानंतर आशाजींना दिलेले वचन अभिनेत्याने पाळले.
दार्जिलिंगमध्ये एवढी थंडी होती की एकदा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांचे शरीर निळे झाले होते. आशा पारेख यांनी त्यांची अवस्था पाहिल्यावर त्यांनी धरमजींना ब्रँडी ऑफर केली, पण त्यांनी एक थेंबही प्याला नाही. त्यामुळे या अभिनेत्रीला धर्मेंद्रचे वागणे खूप आवडले आणि त्यांना आशाजी आणि धर्मेंद्र यांची मैत्री सुरू झाली ती आजही सुरू आहे.
Bollywood Actor Dharmendra and Actress Asha Parekh Friendship Entertainment