गुरूवार, सप्टेंबर 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

फळबाग विमाचा पुढील २ वर्षांचा करार रद्द; राज्य सरकारचा निर्णय 

by Gautam Sancheti
जून 17, 2021 | 11:47 am
in राज्य
0
falbag

मुंबई – हवामानावर आधारित फळबाग विमा योजनेत हवामानाचे निकष बदलवुन विमा कंपन्या सोबत २०२० ते २०२२ पर्यंत ३ वर्षाचा करार राज्य सरकारने केला होता. या कराराने शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही फक्त कंपन्या मालामाल झाल्या. भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रान पेटविल्यानंतर शेवटी शासनाने माघार घेतली. आणि २०२१ व २०२२ वर्षाकरिता विमा कंपन्यासोबत केलेला करार रद्द केला आहे. आता तरी सरकारनी चुक सुधारावी २०१९ चे देवेंद्र फडणवीस शासनाने उंबरठा उत्पादकता ग्राह्य धरून २०२० चा विमा शेतकऱ्यांना द्यावा. व पुढील २ वर्षी करिता विमा कंपन्याबरोबरचा अन्यायपुर्ण करार रद्द करून ९० टक्के जोखीम स्तराप्रमाणे उंबरठा उत्पादकते नुसार करार करावा अशी मागणी  डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये फळबाग विमा योजना शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरली होती. उद्धव ठाकरे सरकार सत्तेत आल्या बरोबर हवामानावर आधारित विमा योजनेचे निकष बदलविले. २०१९ मध्ये फळबाग विमा योजनेमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मृगबहार २०१९ मध्ये २९० कोटी रुपयाचे विमा हप्ते भरण्यात आले होते. आणि शेतकऱ्यांना विमा परताव्या पोटी २९४ कोटी म्हणजे १०१.५% प्राप्त झाले होते. रब्बी फळबाग करिता ११२४रु. विमा हप्ता भरण्यात आला होता. आणि  शेतकऱ्यांना ८३१ कोटी रुपयाची म्हणजे ७३.९३% विमां कंपन्याकडून नुकसानभरपाई मिळाली होती.
उद्धव ठाकरे सरकारनी हवामानाचे निकष बदलविल्यानंतर मृगबहार २०२० मध्ये २१५ कोटी रुपयांचा विमा हप्ता २ लाख १२ हजार शेतकऱ्यांनी भरला होता. परंतु कंपनी धार्जीन्या निकषामुळे फक्त १२ हजार ९० शेतकऱ्यांना २२ कोटी रुपये नुकसानभरपाई मिळाली. विमा कंपन्यांना ठाकरे सरकारने १९३ कोटी रुपयांचा नफा मिळवुन दिला. आंबिया बहार २०२० मध्ये ४७७ कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला होता. १६९ कोटी रुपयाची म्हणजे ३५.४२% नुकसानभरपाई दिली. कंपन्यांचा ३०८ कोटी रुपयाचा फायदा झाला.
भारतीय जनता पक्ष किसान मोर्चानी विम्याच्या प्रश्नी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राळ  उठविली. शासनाने २०२१ व २०२२ साठी विमाकंपनीसोबतचे करार रद्द केले. परंतु या कृतीने २०२० मध्ये शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून निघणार नाही. त्यामुळे २०१९ चे देवेंद्र फडणवीस सरकारचेच निकष लावुन २०२० चा विमा शेतकऱ्यांना द्यावा २०२१ व २०२२ साठी फळबाग विमा करार करतांना देवेंद्र फडणवीस शासनाचे वेळीचे हवामानाचे निकष ग्राह्य धरूनच करार करावा अशी मागणी भाजपा किसान मोर्चा राष्ट्रीय महामंत्री डॉ. अनिल बोंडे यांना केली आहे.
हीच फसगत खरीप व रब्बी विम्यामध्ये उंबरठा उत्पादकता कमी करून करार केल्यामुळे झाली आहे. खरीप विम्यामध्ये फक्त १५ लाख शेतकऱ्यांना तुटपुंजा लाभ मिळाला १२३ लाख शेतकरी विम्यापासून वंचीत राहिले. विमा कंपन्यांना उद्धव ठाकरे सरकारनी ४२३४ कोटी रुपयाचा नफा मिळवुन दिला. कमी केलेले उंबरठा उत्पादकता पुढील दोन वर्षासाठी कायम राहणार आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या सराफांना हॉलमार्किंग मधून सूट; महासंचालक तिवारींची माहिती

Next Post

नाशिक – द्वारका चौकात भारत गॅसचा टॅकर पलटी, मोठी दुर्घटना टळली, वाहतुकीची कोंडी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Government of India logo
संमिश्र वार्ता

देशभरातील पदव्युत्तर आणि पदवी वैद्यकीय शिक्षण क्षमता विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

सप्टेंबर 25, 2025
WhatsApp Image 2025 09 24 at 20.55.59 1024x576 1
संमिश्र वार्ता

बीडच्या प्राचीन कंकालेश्वर मंदिराच्या जतन, दुरुस्तीसाठी ९ कोटी १४ लक्ष रकमेस प्रशासकीय मान्यता

सप्टेंबर 25, 2025
Screenshot 20250830 073400 Chrome
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा निकाल जाहीर…जिल्हास्तरीय स्पर्धेत नाशिकचे हे मंडळ विजेता

सप्टेंबर 25, 2025
G1oWoxaWwAAW4X e1758764683290
मुख्य बातमी

आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाची फायनलमध्ये धडक, सलग पाचवा विजय मिळवत बांगलादेशवर केली ४१ धावांनी मात

सप्टेंबर 25, 2025
Untitled 34
संमिश्र वार्ता

नवरात्र विशेष… बिकानेरची करणी माता… या मंदिरात असतात हजारो उंदीर… अशी आहे या मातेची महती…

सप्टेंबर 25, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना कठीण प्रसंग हाताळावे लागतील, जाणून घ्या, गुरुवार, २४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 24, 2025
Untitled 31
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई मिळणार…कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

सप्टेंबर 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

या इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम शाळेची मान्यता रद्द, विद्यार्थ्यांचे इतर शाळेत समायोजन

सप्टेंबर 24, 2025
Next Post
20210617 135322 rotated

नाशिक - द्वारका चौकात भारत गॅसचा टॅकर पलटी, मोठी दुर्घटना टळली, वाहतुकीची कोंडी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011