बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंदिरा गांधी आल्या, तरी ३७० लागू होणे अशक्य…अमित शाह यांची टीका

नोव्हेंबर 14, 2024 | 6:17 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
amit shah11

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
धुळेः राज्यातील महाविकास आघाडी केवळ तुष्टीकरण करत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. सत्ता मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांची सर्व तत्त्वे विसरले असल्याचा आरोप त्यांनी केला. औरंगाबादच्या नामांतरला विरोध करणारे, राम मंदिराच्या उभारणीला विरोध करणारे, कलम ३७० हटवण्यास विरोध करणारे, पाकिस्तानविरुद्धच्या सर्जिकल स्ट्राईकवर आक्षेप घेणाऱ्या औरंगजेब फॅन क्लबसोबत ठाकरे असल्याचा आरोप त्यांनी केला. इंदिरा गांधी पुन्हा अवतरल्या, तरी काश्मीरमध्ये पुन्हा ३७० लागू करता येणार नाही, अशी टीका त्यांनी केली.

धुळे जिल्ह्यातील जाहीर सभेत शाह यांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकर यांच्या तत्त्वांनुसार काम करणारे असल्याचे सांगून ते म्हणाले, की राहुल गांधी यांनी कान उघडे ठेवून ऐकवे, की तुमची चौथी पिढी आली तरीदेखील मुस्लिम समाजाला आरक्षण देता येणार नाही. मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर एससी, एसटी, ओबीसी आणि इतर समाजातील आरक्षण कमी करून द्यावे लागणार आहे; मात्र ते होणे शक्य नाही.

देशातील सर्व उलेमांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांची भेट घेतली असून त्यांच्याकडे आरक्षणाची मागणी केली असल्याचे सांगत या मुद्द्यावरून शाह यांनी राहुल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम वापस आणण्याचा प्रस्ताव काँग्रेसने केला आहे; मात्र राहुल गांधीच नाही, तर इंदिरा गांधी स्वर्गातून परत आल्या तरी ३७० कलम परत आणू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री असताना काश्मीरमधील लाल चौकात जायला भीती वाटत असल्याचे म्हणाले होते; मात्र आता तुम्ही गृहमंत्री नाही तर मी गृहमंत्री आहे. तुमच्या नातवांना घेऊन काश्मीरला जा, तुमच्या केसांनादेखील धक्का लागणार नसल्याचे आव्हान या वेळी शहा यांनी शिंदे यांना दिले. उद्धवबाबू, तुम्ही कोणासोबत आहात? आज तुम्ही औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणारे, राम मंदिराच्या उभारणीला विरोध करणारे, कलम ३७० रद्द करण्याला विरोध करणारे आणि पाकिस्तानविरुद्धच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’वर आक्षेप घेणाऱ्यांच्या सोबत आहात. राज्यातील महाविकास आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब असल्याचे शाह म्हणाले

हरियाणा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करत होता; मात्र निवडणुकीचा निकाल आला आणि त्या ठिकाणी काँग्रेसचा सुपडा साफ झाला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. महाराष्ट्रात देखील २३ तारखेचा निकाल आल्यानंतर काँग्रेसचा सुपडा साफ झालेला असेल. राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होईल, असा दावा शाह यांनी केला आहे. राज्यातील सर्व लाडक्या बहिणीला कमळच्या फुलासोबत आणि भारतीय जनता पक्षासोबत असल्याचे सांगून ते म्हणाले, की आमच्या बहिणींसाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस काम करत आहेत; मात्र याला सुप्रिया सुळे विरोध करत आहेत;मात्र त्यांची चिंता तुम्ही करू नका, महायुतीचे सरकार स्थापन करा आणि लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये २१०० रुपये जमा होत राहतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

आघाडीतील नेते सर्व समुदायाचा विरोध करतात. रामगिरी महाराजांच्या विरोधात इथे वक्तव्य केले जात आहे. सिंदखेडमध्ये दंगली घडवल्या जात आहेत. देश आणि महाराष्ट्रासाठी योग्य नसणाऱ्या लोकांचे समर्थन महाविकास आघाडी करत असल्याचा आरोप शाह यांनी केला. काँग्रेस पक्ष हा एसटी-एससी आणि विशेष करून मागासवर्गीय नागरिकांचा विरोध करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी अजित पवार गटाला दिले हे निर्देश

Next Post

अदानींसह सर्वंच उद्योजकांशी माझे संबंध…अजितदादांच्या गौप्यस्फोटावर शरद पवारांचे भाष्य

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
Sharad Pawar

अदानींसह सर्वंच उद्योजकांशी माझे संबंध…अजितदादांच्या गौप्यस्फोटावर शरद पवारांचे भाष्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011