मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंदिरा गांधी आल्या, तरी ३७० लागू होणे अशक्य…अमित शाह यांची टीका

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 14, 2024 | 6:17 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
amit shah11

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
धुळेः राज्यातील महाविकास आघाडी केवळ तुष्टीकरण करत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. सत्ता मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांची सर्व तत्त्वे विसरले असल्याचा आरोप त्यांनी केला. औरंगाबादच्या नामांतरला विरोध करणारे, राम मंदिराच्या उभारणीला विरोध करणारे, कलम ३७० हटवण्यास विरोध करणारे, पाकिस्तानविरुद्धच्या सर्जिकल स्ट्राईकवर आक्षेप घेणाऱ्या औरंगजेब फॅन क्लबसोबत ठाकरे असल्याचा आरोप त्यांनी केला. इंदिरा गांधी पुन्हा अवतरल्या, तरी काश्मीरमध्ये पुन्हा ३७० लागू करता येणार नाही, अशी टीका त्यांनी केली.

धुळे जिल्ह्यातील जाहीर सभेत शाह यांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकर यांच्या तत्त्वांनुसार काम करणारे असल्याचे सांगून ते म्हणाले, की राहुल गांधी यांनी कान उघडे ठेवून ऐकवे, की तुमची चौथी पिढी आली तरीदेखील मुस्लिम समाजाला आरक्षण देता येणार नाही. मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर एससी, एसटी, ओबीसी आणि इतर समाजातील आरक्षण कमी करून द्यावे लागणार आहे; मात्र ते होणे शक्य नाही.

देशातील सर्व उलेमांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांची भेट घेतली असून त्यांच्याकडे आरक्षणाची मागणी केली असल्याचे सांगत या मुद्द्यावरून शाह यांनी राहुल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम वापस आणण्याचा प्रस्ताव काँग्रेसने केला आहे; मात्र राहुल गांधीच नाही, तर इंदिरा गांधी स्वर्गातून परत आल्या तरी ३७० कलम परत आणू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री असताना काश्मीरमधील लाल चौकात जायला भीती वाटत असल्याचे म्हणाले होते; मात्र आता तुम्ही गृहमंत्री नाही तर मी गृहमंत्री आहे. तुमच्या नातवांना घेऊन काश्मीरला जा, तुमच्या केसांनादेखील धक्का लागणार नसल्याचे आव्हान या वेळी शहा यांनी शिंदे यांना दिले. उद्धवबाबू, तुम्ही कोणासोबत आहात? आज तुम्ही औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणारे, राम मंदिराच्या उभारणीला विरोध करणारे, कलम ३७० रद्द करण्याला विरोध करणारे आणि पाकिस्तानविरुद्धच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’वर आक्षेप घेणाऱ्यांच्या सोबत आहात. राज्यातील महाविकास आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब असल्याचे शाह म्हणाले

हरियाणा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करत होता; मात्र निवडणुकीचा निकाल आला आणि त्या ठिकाणी काँग्रेसचा सुपडा साफ झाला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. महाराष्ट्रात देखील २३ तारखेचा निकाल आल्यानंतर काँग्रेसचा सुपडा साफ झालेला असेल. राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होईल, असा दावा शाह यांनी केला आहे. राज्यातील सर्व लाडक्या बहिणीला कमळच्या फुलासोबत आणि भारतीय जनता पक्षासोबत असल्याचे सांगून ते म्हणाले, की आमच्या बहिणींसाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस काम करत आहेत; मात्र याला सुप्रिया सुळे विरोध करत आहेत;मात्र त्यांची चिंता तुम्ही करू नका, महायुतीचे सरकार स्थापन करा आणि लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये २१०० रुपये जमा होत राहतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

आघाडीतील नेते सर्व समुदायाचा विरोध करतात. रामगिरी महाराजांच्या विरोधात इथे वक्तव्य केले जात आहे. सिंदखेडमध्ये दंगली घडवल्या जात आहेत. देश आणि महाराष्ट्रासाठी योग्य नसणाऱ्या लोकांचे समर्थन महाविकास आघाडी करत असल्याचा आरोप शाह यांनी केला. काँग्रेस पक्ष हा एसटी-एससी आणि विशेष करून मागासवर्गीय नागरिकांचा विरोध करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी अजित पवार गटाला दिले हे निर्देश

Next Post

अदानींसह सर्वंच उद्योजकांशी माझे संबंध…अजितदादांच्या गौप्यस्फोटावर शरद पवारांचे भाष्य

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

SUPRIME COURT 1
संमिश्र वार्ता

धर्मांतरविरोधी कायद्यांना स्थगिती देण्यासाठी दाखल याचिकांवर सुनावणी…सर्वोच्च न्यायालायने दिले हे निर्देश

सप्टेंबर 16, 2025
G04fkJmWIAATyZA e1758000093714
संमिश्र वार्ता

अंजली दमानियांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती…अमोल मिटकरींनी डिवचलं तर रोहित पवारांनी केले कौतुक

सप्टेंबर 16, 2025
cbi
भविष्य दर्पण

सीबीआयने या माजी मंत्र्यांच्या बहिणी, मेहुण्या, पीएच्या जागेवर १६ ठिकाणी टाकले छापे…मिळाले हे घबाड

सप्टेंबर 16, 2025
income
संमिश्र वार्ता

ITR- प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यास मुदतवाढ…इन्कम टॅक्स भरणा-यांना दिलासा

सप्टेंबर 16, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

रेल्वेच्या ऑनलाइन आरक्षित तिकीट बुक करण्याच्या नियमात १ ऑक्टोबरपासून होणार बदल

सप्टेंबर 16, 2025
Untitled 22
संमिश्र वार्ता

नाशिकहून एअरलिफ्ट करण्यासाठी हॅलिकॉप्टर…बीडमध्ये बचाव कार्याला गती

सप्टेंबर 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची भाडे आकारणी बंधनकारक…बघा, शासनाचा निर्णय

सप्टेंबर 16, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना आर्थिक स्थिती आनंद देईल, जाणून घ्या,मंगळवार, १६ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 16, 2025
Next Post
Sharad Pawar

अदानींसह सर्वंच उद्योजकांशी माझे संबंध…अजितदादांच्या गौप्यस्फोटावर शरद पवारांचे भाष्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011