सोमवार, ऑगस्ट 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बंगालमध्ये भाजपला मिळणार आणखी झटके ; असे आहे समीकरण…

by Gautam Sancheti
सप्टेंबर 19, 2021 | 11:14 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
bjp

विशेष प्रतिनिधी, कोलकाता :
पश्चिम बंगाल मध्ये काही महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुकीत कदाचित भाजपचीच सत्ता येईल, या अपेक्षेने तृणमूल काँग्रेस मधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु राज्यात पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसची सत्ता आल्याने आता भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांनी पुन्हा सुगृही परतण्याची वाट धरली आहे. भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांच्यापासून या पक्षांतराला सुरुवात झाली असून भाजपला आणखी झटके मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री मंडळातून नुकतेच काढून टाकलेले लोकसभा खासदार बाबुल सुप्रियो यांनी भाजप सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपचे अनेक नेते तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. यातील बहुतांश नेते हे पुर्वी तृणमूल काँग्रेस मध्येच होते, परंतु सत्तेत बदल होण्याची शक्यता पाहून काही काळापूर्वी ते भाजपमध्ये सामील झाले होते. त्यामुळे भाजपला आता भीती आहे की, पश्चिम बंगालच्या सद्य परिस्थितीत त्याचे आणखी काही नेते पक्ष सोडू शकतात.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर आता तृणमूल काँग्रेसकडून भाजप नेत्यांवर सातत्याने दबाव वाढत आहे. राज्यातील सर्व नेते सतत आपल्या तक्रारी घेऊन दिल्लीत येत आहेत. विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन यासंदर्भातील अनेक कागदपत्रे दिली. राज्यातील अनेक भाजप आमदार पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांची भेट घेऊन तृणमूल काँग्रेसकडून दबाव आणल्याबद्दल तक्रार करत आहेत. अशा स्थितीत अनेक आमदार अजूनही भाजप बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत.

बाबुल सुप्रियो यांनी तृणमूलमध्ये जाणे हेच त्यांना मंत्रिपदावरून हटवण्याचे एकमेव कारण आहे. संतापलेल्या सुप्रियोने ३१ जुलै रोजी भाजप सोडण्याची घोषणा केली होती. तसेच इतर कोणत्याही पक्षात सामील होणार नसल्याचे सांगितले होते. लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा देण्याबाबतही ते बोलले होते. आता त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे संख्याबळ ३ आमदारांवरून ७७ पर्यंत वाढले, परंतु तरीही ते सत्तेपासून दूर राहिले. तर दुसरीकडे, ममता बॅनर्जींनी प्रचंड विजय मिळवून आपली सत्ता टिकवली. दरम्यान,भाजपचे पश्चिम बंगालचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, राज्यातील ममता बॅनर्जी सरकारकडून भाजपच्या आमदारांवर सतत दबाव आणला जात आहे. पक्षाचे खासदार अर्जुन सिंह यांच्यावर नुकत्याच झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, येथे भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका वाढत आहे. अशा स्थितीत काही नेत्यांनी पक्ष सोडला तर त्यांची मजबुरी समजू शकते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खलनायक शक्ती कपूर यांची ही अनोखी लव्ह स्टोरी तुम्हाला माहित आहे का?

Next Post

काँग्रेसने का बदलला पंजाबचा मुख्यमंत्री? हे आहे कारण

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
amrinder

काँग्रेसने का बदलला पंजाबचा मुख्यमंत्री? हे आहे कारण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Eknath Shinde e1714057426383

लाडक्या बहिणीनंतर आता लाडकी सून योजना…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ऑगस्ट 18, 2025
FSI4EA3P e1755487718348

मुंबईत महिलांद्वारे चालवल्या जाणाऱ्या पहिल्या स्वच्छ स्ट्रीट फूड हबची सुरूवात…ईट राईट इंडियाचा हा आहे उपक्रम

ऑगस्ट 18, 2025
akhilesh yadav

निवडणूक आय़ोगाच्या पत्रकार परिषदेनंतर अखिलेश यादव यांनी थेट प्रतिज्ञापत्रांच्या पावत्याच केल्या पोस्ट….

ऑगस्ट 18, 2025
Gyj9FwXXMAAG8KV

दिल्लीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी हालचाली वाढल्या…बिनविरोधसाठी राजनाथसिंह यांनी केला खरगे यांना फोन

ऑगस्ट 18, 2025
प्रातिनिधीक छायाचित्र

ठाकरे बंधुची लिटमस टेस्ट… बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीसाठी आज मतदान उद्या मतमोजणी

ऑगस्ट 18, 2025
IMG 20250817 WA0031

क्रेडाईच्या गृह प्रदर्शनास मोठा प्रतिसाद…आज शेवटचा दिवस

ऑगस्ट 18, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011