मुंबई(इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य सरकारने रेडी रेकनर दरात मोठी वाढ केली असून त्याचा मोठा फटका मालमत्ता खरेदी करणा-यांना बसणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात ५.९५ (मुंबई वगळता) एवढी वाढ केली आहे. तर ग्रामीण भागात ३.३६ वाढ करण्यात आली आहे.
२०१७-१८ साली वार्षिक रेडी रेकनगर दर तयार करण्यात आले होते. त्यानंतर सलग दोन वर्षे स्थावर मिळकत क्षेत्रात मंदीचा विचार करुन २०१८-१९ व २०१९-२० साठी दर पूर्वीचे कायम ठेवण्यात आला होता. यानंतर कोरोना संकटामुळे हे दर कमी प्रमाणात वाढवण्यात आले होते. ते पुढे २०२२-२३ मध्ये वाढविण्यात आले. त्यानंतर हेच दर २०२४-२५ मध्ये कायम ठेवण्यात आले. आता २०२५-२६ मध्ये हे दर वाढवण्यात आले आहे.
