इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकीली करणा-या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याककडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जे.सी.बी पाईपने जबर मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी सरपंचासह दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
महिलेने गावातील ध्वनिप्रदूषणामुळे मायग्रेन चा त्रास होत असल्याने आवाज कमी करावा ,लाऊडस्पीकर लाऊ नयेत घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या. या तक्रारीमुळे सरपंच व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यात महिला बेशुद्ध पडल्यानंतर दवाखान्यातुन ही एका रात्रीत ऊपचार करून घरी पाठवलं आहे
सरपंच आणि इतर दहा पुरूषांनी मिळुन एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य? गावात सरपंचाचा कारभार कसा असेल कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.