बुधवार, सप्टेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बांगलादेशात गेल्या ९ वर्षात हिंदू समुदायावर ३६०० हल्ले; ही आहेत कारणे

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 22, 2021 | 2:25 pm
in राष्ट्रीय
0
FBv8yNoVcAMJvD

नवी दिल्ली – भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या बांगलादेशमध्ये सध्या हिंदू समुदायाला लक्ष्य केले जात आहे. या हल्ल्यांमुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच हिंदू मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळांचेही मोठे नुकसान केले जात आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदू समुदायावर सातत्याने हल्ले होत आहेत. वास्तविक, 1971 मध्ये बांगलादेशच्या निर्मिती झाल्यापासूनच हिंदू समुदायाशी ही लढाई सुरू झाली आहे. गेल्या नऊ वर्षांत हिंदूंवर 3600 हून अधिक हल्ले झाले आहेत. कारण बांगलादेशात 1974 मध्ये प्रथम जनगणना झाली. यानुसार 1974 मध्ये देशात 13.5 टक्के हिंदू होते, परंतु 2011 मध्ये केवळ 8.5 टक्के हिंदू देशात राहिले. 2011 ते 2021 पर्यंत त्यात आणखी तीन टक्क्यांनी घट झाली आहे. विशेष म्हणजे या देशात हिंदूंची संख्या वर्षानुवर्ष कमी होत आहे. आता तर पाकिस्तान प्रमाणेच हिंदू या देशात अत्यंत अल्पसंख्यांक झाले आहेत, काय आहे नेमकी कारणे जाणून घेऊ या…

अत्याचार वाढले
पाकिस्तान पासून वेगळा देश निर्माण झाल्यानंतर येथे हिंदूंवरील अत्याचार वाढू लागले. तेव्हा पासून असे एक वर्ष गेले नाही की, येथे अल्पसंख्याक समुदायाला हल्ल्याचा सामना करावा लागला नाही. गेल्या नऊ वर्षांत हिंदूंवर 3600 हून अधिक हल्ले झाले आहेत. मानवाधिकार संघटनांची ही आकडेवारी आहे. बांगलादेशात 1990, 1995, 1999, 2002 मध्ये मोठ्या दंगली झाल्या. यामध्ये केवळ हिंदूंनाच लक्ष्य केले गेले. आता बांगलादेशात हिंदू मंदिरांची तोडफोड, हिंदूंची घरे जाळणे, मुला -मुलींचे अपहरण, बलात्कार अशा घटना जणू काही सामान्य झाल्या आहेत.

अतिरेकी तरूण
एका अहवालानुसार, बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराचे मुख्य कारण म्हणजे त्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न आहे. काही अहवालांमध्ये ही वस्तुस्थिती निदर्शनास आली आहे. किंबहुना, हिंसाचाराच्या प्रकारात हे दिसून आले आहे की, बहुसंख्य लोकसंख्या गरीब हिंदूंची घरे जाळते. घर जाळल्यामुळे या हिंदू कुटुंबांना स्थलांतर करण्यास भाग पाडले जाते आणि त्यांनी स्थलांतर करताच तेथे रहिवासी हे त्यांच्या घरे आणि जमिनीचा ताबा घेतात.

तर 2050 पर्यंत 
2016 मध्ये बांगलादेशातील हिंदूंच्या स्थितीवर एक पुस्तक प्रसिध्द करण्यात आले. आता पुढील तीन दशकांत बांगलादेशातून हिंदूंचे नामोनिशान मिटवले जाईल, असा दावा या पुस्तकात करण्यात आला होता. सदर पुस्तक हे ढाका विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. अबुल बरकत यांच्या संशोधनावर आधारित आहे. त्यांच्या मते, अल्पसंख्याक समुदायाचे सरासरी 632 लोक दररोज बांगलादेश सोडत आहेत.

मूलगामी संघटना
सध्या बांगलादेशातील कट्टरपंथी संघटनांचा प्रभाव लक्षणीय वाढला आहे. कट्टरपंथी संघटना अनेकदा अल्पसंख्याक हिंदू समाजाला लक्ष्य करतात. देशभरात कट्टरपंथी विचारांच्या लोकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यांनी वेळोवेळी हिंदू समाजाच्या विरोधात अनेक मोर्चे काढले.

1971 मध्ये सर्वाधिक
बांगलादेशच्या इतिहासातील हिंदूंवरील सर्वात जास्त गुन्हे 1971 च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामादरम्यान घडले. या दरम्यान पाकिस्तानी सैन्याने हिंदूंचे गाव पुसले. एका अहवालानुसार, या काळात 30 लाखांहून अधिक हिंदूंची कत्तल करण्यात आली, असे एका अहवालात म्हटले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पीएम काका… पीएम काका….आवाज ऐकताच नरेंद्र मोदी झाले स्तब्ध

Next Post

नाशिक – बिटकॉईन मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने १५ लाखाला गंडविले

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

mukt
संमिश्र वार्ता

महाज्ञानदीप’ पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू

सप्टेंबर 17, 2025
crime 88
क्राईम डायरी

दुमजली माडीचे कौले काढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 17, 2025
accident 11
क्राईम डायरी

गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून दांम्पत्य पडले…६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 17, 2025
crime114
क्राईम डायरी

कर्जदारास बंदुकीचा धाक दाखवून सावकाराने केले अपहरण…व्याजासह मुद्दल परत करुनही घडला प्रकार

सप्टेंबर 17, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
संमिश्र वार्ता

राज ठाकरे यांनी अमित शाह, जय शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून केला हल्लाबोल…

सप्टेंबर 17, 2025
e vidhya 1024x275 1 e1758078658915
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या

सप्टेंबर 17, 2025
eknath shinde
महत्त्वाच्या बातम्या

राज्यात ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान…प्रत्येक उद्यानासाठी १ कोटीचा निधी

सप्टेंबर 17, 2025
FB IMG 1758073921656 e1758074047317
संमिश्र वार्ता

कोकणच्या सौंदर्याचा ‘दशावतार’…बॉक्स ऑफीसवर तुफान हीट…

सप्टेंबर 17, 2025
Next Post
crime diary 2

नाशिक - बिटकॉईन मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने १५ लाखाला गंडविले

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011