इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नेपाळ: कथित भ्रष्टाचार आणि फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अलिकडेच बंदी घातल्याबद्दल काठमांडूमध्ये लोकांनी सोमवारी सरकारविरुद्ध मोर्चा काढून निषेध केला. या निषेध मोर्चात २० जणांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक लोक जखमी झाले. त्यानंतर आता नेपाळच्या केपी शर्मा ओली सरकारने २६ सोशल मीडियावरील बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान गृहमंत्री रमेश लेखक यांनी राजीनामा दिला आहे.
कालच्या मोर्चात मोठ्या प्रमाणात तरुण सहभागी झाले होते. त्यानंतर काठमांडुमध्ये कर्फ्यू लावण्यात आला. तर दुसरीकडे युवक अद्यापही माघार घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला.
नेपाळमध्ये २६ प्रमुख सोशल मीडिया अॅपवर बंदी घालण्यात आली होती. या बंदीनंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली. फेसबुक, युट्युब, एक्स, इन्साग्राम, व्हॅाटसअॅप, सह लोकप्रिय प्लॅलफॅार्मवर सरकारने बंदी घातल्यानंतर तरुण रस्त्यावर उतरले होते. भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदी विरोधात निषेध करण्यासाठी तरुण रस्त्यावर उतरले होते.