नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २०११ च्या सामाजिक आर्थिक व जातीय सर्वेक्षणातून नाशिक जिल्ह्यातील लाभार्थ्यांची जन आरोग्य योजनेसाठी निवड करण्यात आली आहे जिल्ह्यात या योजनेसाठी १६,०७,१४४ लाभार्थी पात्र ठरले आहेत. २३ सप्टेंबर २०१८ पासून आज पर्यंत सरासरी ४,९०,००० लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारतचे इ कार्ड म्हणजेच गोल्डन कार्ड काढलेले आहे. कोविड मुळे दोन वर्ष या योजनेत लाभार्थींचा सहभाग कमी होता उर्वरित सरासरी ११ लाख व्यक्तींचे गोल्डन कार्ड काढणे बाकी आहे, नाशिक जिल्ह्यातील आपले सरकार केंद्र व सीएससी केंद्र येथे हे कार्ड यापुढेही काढून मिळणार आहे यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग तसेच जिल्हा रुग्णालय यांच्यातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत असून गोल्डन कार्ड काढण्यासाठी मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे तरी लाभार्थींनी आपल्या जवळच्या आपले सरकार केंद्र किंवा सीएससी केंद्रात जाऊन मोफत स्वरूपात इ कार्ड म्हणजेच गोल्डन कार्ड काढून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांनी केले आहे आयुष्यमान भारत इ कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्याकडे असलेले आयुष्यमान भारत चे पत्र ,रेशन कार्ड किंवा आधार कार्ड ही कागदपत्र घेऊन जवळच्या सीएसी किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जावे स्वतःचा मोबाईल क्रमांक जवळ ठेवावा त्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक हा नोंदणी करणाऱ्या व्यक्तीस द्यावा म्हणजेच इ कार्ड त्वरित तयार होऊन आपल्याला उपलब्ध होईल त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही कोणत्याही सीएसी किंवा आपले सरकार सेवा केंद्राकडून लाभार्थ्याला पैशाची मागणी केल्यास त्याची तक्रार तहसील किंवा जिल्हाधिकारी कार्यालय येथे करावी तक्रारीत सत्यता दिसून आल्यास संबंधित केंद्राचा परवाना रद्द करण्यात येईल या जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना विविध आजारावर उपचार व शस्त्रक्रियांसाठी जिल्ह्यातील ६३ सरकारी व खाजगी हॉस्पिटलचा समावेश करण्यात आला असून आयुष्यमान भारतचे ई कार्ड म्हणजेच गोल्डन कार्ड काढल्यास विविध १२०९ प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रियाचा यात समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील ३,७१,७२७ लाभार्थींनी ही योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत लाभ घेतला असून योजनेअंतर्गत ७८६१४२१७०८ रुपये खर्च करण्यात आले असून यामध्ये आयुष्यमान भारत पात्र लाभार्थ्यांना ५ लक्ष रुपये पर्यंत वैद्यकीय संरक्षण मिळते महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये ९९६ आजारांचा समावेश करण्यात आला आहे या योजनेत प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षी एक लाख ५० हजार रुपये पर्यंतचे वैद्यकीय संरक्षण मिळते.तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी दोन लक्ष ५० हजार रुपयांची तरतूद केली असून ज्या लाभार्थींनी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढलेले नाही त्यांनी आपल्या घरा जवळच्या आपले सरकार किंवा सी एस सी सेवा केंद्रात जाऊन हे कार्ड काढून घ्यावे असे आवाहन नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी केले आहे