गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आठवणीतील साहित्य संमेलन – ‘माणसांचा समुद्र वन्स मोर म्हणत होता’

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 20, 2021 | 6:15 pm
in इतर
0
IMG 20211118 WA0001

‘माणसांचा समुद्र वन्स मोर म्हणत होता’

– रमजान मुल्ला
पंच्याएशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्य मंडपात होणाऱ्या काव्य संमेलनात माझी निवड झाल्याचं पत्र मिळालं अन् माझ्या अं गावरून मोरपीस फिरत असल्याचा मला भास झाला. वसंत आबाजी डहाके यांच्या अध्यक्षतेखाली होणारे हे साहित्य संमेलन विदर्भात चंद्रपूर या ठिकाणी होणार होतं. इतक्या लांबवर होणाऱ्या साहित्य उत्सवात जाण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग. त्या आधी फारतर अकोल्या पर्यंत कविसंमेलनाच्या निमित्ताने एकट्याने गेलेलो. पण यावेळी मी तिकडे जाणारा एकटा नव्हतो. माझ्यासोबत अजून तिघे मित्र होते. त्यामुळे मला अधिक आनंद झालेला.

महाराष्ट्र एक्सप्रेसचं रेल्वेचं बुकिंग केलं. अन् संमेलनाच्या दिवसाची वाट बघत राहिलो. दीड दिवसांच्या महाराष्ट्राच्या अर्धवर्तुळी प्रवासातून दुसऱ्या दिवशी दुपार नंतर वर्ध्याला पोहोचलो. अन् तिथून जवळ असलेले सेवाग्राम बघितले. गांधीजींच्या आश्रमात मनाला खूप शांतता मिळाली. तिथल्या झाडांच्या व साध्या घराच्या सानिध्यात मन प्रसन्न झाले.
सायंकाळी उशिरा चंद्रपुरात महामंडळाने आमची व्यवस्था केलेल्या हॉटेल वर पोहोचलो. सकाळी लवकर उठून साहित्य संमेलनाच्या आवारात गेलो. तिथले वातावरण बघून थक्क झालो. भरगच्च मंडप, खचाखच भरलेले पुस्तकांचे स्टॉल, विद्युत रोषणाई, भलं मोठं प्रवेशद्वार, तिथली भली मोठी रांगोळी हे सगळं अवाढव्य होतं. मुख्य मंडप तर अतोनात फुलांनी सजवला होता. पाठीमागे मोठी स्क्रीन. त्यावर मंडपात चालू असलेला कार्यक्रम लाईव्ह दिसत होता. याच व्यासपीठावरून आपण कविता सादर करणार याचा फक्त विचार करूनच अंगावर फुलांची उधळण झाल्यासारखे वाटले.

संमेलनाचे उद्घाटन माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते जोरदार पार पडले. साहित्य महामंडळाचे मुख्य कार्यवाह मिलिंद जोशी, अध्यक्षा उषा तांबे व अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर होणाऱ्या एकेका परिसंवादात वेचक वक्ते आपल्या बाजू लावून धरत होते. अभ्यासाचा खीस पडत होता. डोळे विस्फारून बघण्यापलीकडे मला कांहीच करता येत नव्हतं. टिपण काढत होतो. नव्या लोकांच्या ओळखी करून घेत होतो. पण सगळंच भारावलेलं वातावरण होतं.

आमचं कविसंमेलन एक तासावर आलेलं. पण माझा शिवून घेतलेला नवा पांढरा शर्ट पिशवीत सफरचंद फुटल्यामुळे डागळून गेलेला. माझ्या मित्राने त्यावर पोंड्स पावडर थापली. त्यामुळे डाग थोडासा अंधुक झालेला. मी मनातून थोडा नाराजच होतो. कोणती कविता म्हणावी कविसंमेलनात? हा प्रश्न मला अजिबात सुटत नव्हता. तो प्रश्न साहित्य संमेलनात कथा कथन सत्रात निमंत्रित असलेले माझे मित्र हिंमत पाटील यांनी सोडवला. अन् मी मनाची पूर्ण तयारी करून व्यासपीठावर दिग्गजांच्या मधोमध बसलो. समोर बघतोय तर रसिकांच्या पहिल्या रांगेत विठ्ठल वाघ बापू बसलेले. अन् त्यांच्या मागे समुद्र पसरावा तसे लोकच लोक. प्रत्येक कवी आपली अनुभवाने ताऊन सुलाखून आलेली कविता तासून म्हणू लागले. माझे नाव कधी घेतील याचा मलाही अंदाज नव्हता.औरंगाबाद मधल्या ललित अधाने यांची कविता झाली. अन् माझे नाव पुकारले.

मी शांतपणे माईक वर गेलो. मला हवा तसा माईक लावून घेतला. अन् तितक्याच शांततेने मला तोंडपाठ असलेली माझी “धोंडा” कविता म्हटली. अन् मी डोळे उघडले. त्यावेळी खाली असलेला माणसांचा समुद्र वन्समोssssअर् असे उभे राहून ओरडत होता. त्या सर्वांच्या आग्रहास्तव मला पुन्हा कविता म्हणावी लागली. माझे सगळेच मित्र तर कमालीचे खुश झालेले. अख्ख्या संमेलनात कवितेला वन्स मोअर मिळालेला मी एकटाच कवी. त्यामुळे तिथं उपस्थित असलेला प्रत्येकजण मला एकदमच ओळखू लागलेला.

दुसऱ्या दिवशीपासून मी दिसेल त्या ठिकाणी लोक मला भेटू लागले. माझ्या सह्या घेऊ लागले. माझ्यासोबत फोटो घेऊ लागले. हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं. तशात मुख्य मंडपात एखादा परिसंवाद संपला की मधल्या वेळेत काल गाजलेली माझी कविता पुन्हा पुन्हा स्क्रीनवर दाखवली जाऊ लागली. त्यामुळे तर जे लोक काल हजर नव्हते त्यांच्यापर्यंत सुद्धा मी आपोआप पोहोचलो. आपसूकच माझ्या भोवतालचे कोंडाळे वाढू लागले. लोकांशी बोलून बोलून, सतत हसरा चेहरा करून माझा जबडा दुखू लागला. अनेक वृत्तपत्रांचे प्रतिनिधी मला भेटत होते. चॅनल वाले भेटत होते. मी तीन दिवस वेगळ्याच विश्वात होतो.

अखेर साहित्य संमेलन संपले व आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. पण मनाने मी अजून तिथेच होतो. अखिल भारतीय साहित्य संमेलन भरवणाऱ्या सगळ्या लोकांचे चेहरे डोळ्यापुढे दिसत होते. त्यांचे मनापासून मी आभार मानत होतो. व साहित्य महामंडळाला धन्यवाद देत होतो. … खरंच आठवणी देखील किती मनोरम असू शकतात ना…!!!
– रमजान मुल्ला (मु. पो. नागठाणे, ता. पलूस, जि. सांगली. मो. 9372540985)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती; या उमेदवारांना मिळेल संधी

Next Post

व्वा! आता आधार क्रमांकावरूनही पाठवता येणार पैसे

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime1
क्राईम डायरी

घरातील साफ सफाई करणा-या दांम्पत्याने बंगला मालकाच्या साडेसहा लाखाच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 18, 2025
court 1
महत्त्वाच्या बातम्या

हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली…मराठा समाजाला दिलासा

सप्टेंबर 18, 2025
accident 11
क्राईम डायरी

अज्ञात चारचाकीने दिलेल्या धडकेत ४८ वर्षीय महिला ठार…नाशिक येथील घटना

सप्टेंबर 18, 2025
crime114
क्राईम डायरी

मैत्रिणीशी लग्न केले म्हणून टोळक्याने तरूणाचे अपहरण करुन लुटले…त्र्यंबरोड भागातील घटना

सप्टेंबर 18, 2025
rohit pawar
संमिश्र वार्ता

रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे…रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यावर टीका

सप्टेंबर 18, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने वरिष्ठ पासपोर्ट अधीक्षकांच्या मालमत्ता जप्त करण्याचे दिले आदेश

सप्टेंबर 18, 2025
Untitled 25
महत्त्वाच्या बातम्या

हायड्रोजन बॅाम्ब…राहुल गांधी यांची पत्रकार परिषद…बघा लाईव्ह

सप्टेंबर 18, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याचे उद्घाटन2 2
मुख्य बातमी

येत्या १ मे पर्यंत सेवा हमी कायद्यांतर्गत ११०० सेवा डिजीटल होणार…

सप्टेंबर 18, 2025
Next Post
upi

व्वा! आता आधार क्रमांकावरूनही पाठवता येणार पैसे

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011