बुधवार, सप्टेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आठवणीतील साहित्य संमेलन- राजकारणातही साहित्यप्रेमी, त्यांच्याशिवाय रंगत नाही

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 23, 2021 | 11:08 am
in इतर
0
IMG 20211121 WA0017 e1637647860113

राजकारणातही साहित्यप्रेमी, त्यांच्याशिवाय रंगत नाही
– भास्कर कदम 
साहित्य संमेलनात वैचारिक, साहित्यिक मेजवानी मिळते. काव्य कट्टयावर ‘जे न देखे रवी वो देखे कवी’ याचा शब्दांगणिक साक्षात्कार होतो. संमेलनाचे सूप वाजल्यानंतर त्याचे कवित्व शिल्लक राहते. त्यामुळे साहित्य संमेलन खऱ्याअर्थाने लक्षात राहते. आणिबाणीच्या काळातील साहित्यविदुषी दुर्गा भागवत यांचा दुर्गावतार आजही स्मरणात आहे. राजकारणातील साहित्य रसिक नव्हेतर खऱ्याअर्थाने साहित्यिक असलेले यशवंतराव चव्हाण यांना मंचावर स्थान मिळू शकले नव्हते.

औरंगाबादचे साहित्य संमेलन माझ्या चांगलेच लक्षात राहिले ते राजकारण्यांच्या सहभागाने गाजले ते वेगळ्याच अर्थाने त्याचे कारण असे की, त्यावेळी साहित्यिक आणि राजकारणी यांचेत परिसंवाद झाला तो गाजविला राजकारण्यांनी. साहित्यिकांची काहीशी मिळमिळीत भाषणे, वैचारिक मांडणी आणि राजकारण्यांची चौफेर टोलेबाजी बघायला, ऐकायला मिळाली. साहित्यिकात रंगनाथ पाठारे सारखी अभ्यासू मंडळी होती. राजकारण्यात तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख , विनायकदादा पाटील इत्यादी मंडळी होती. त्यावेळी मंडपातील श्रोते साहित्यिकांपेक्षा राजकारण्यांचा भाषणाला भरभरुन दाद देत होती. परिसंवादाच्या फडात राजकारण्यांनी बाजी मारली होती. त्यावेळच्या विनायकदादा पाटील यांच्या भाषणातील एक मुद्दा खास दाद घेऊन गेला. त्यांची मांडणी होती की, शेतकरी सुद्धा खऱ्याअर्थाने साहित्यिक आहे. तो आपल्या काळ्यामातीत साहित्य पिकवतो. धनधान्य हे साहित्य आपल्या जगण्यासाठी उपयुक्त तितकेच आवश्यक असते म्हणून माझ्या दृष्टीने शेतकरी हाही साहित्यिकच आहे. दादांच्या या भाषणाला श्रोतू वर्गातून भरभरुन दाद मिळाली. दादा मूळचे तसे पत्रकार व साहित्यिक. विलासराव देशमुख यांनी तर त्यांच्या खास शैलीत विषयाची मांडणी केली. त्याला तर श्रोते उत्स्फूर्तपणे दाद देत होते, ह्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार होतो.

दुसरा प्रसंग आहे तो साहित्यिक केशव मेश्राम तो त्यांच्या अध्यक्षीय भाषणातील आहे. त्यांनी मांडणी केलेला एक मुद्दा फार महत्वाचा होता. तो मुद्दा असा की, कितीदाही विश्वासघात झाला तरी विश्वासाला पर्याय नाही. हा मुद्दा मी प्रत्यक्ष जीवनात रोजच अनुभवत आहे. साहित्यिक जेव्हा वैचारिक मांडणी करतो तेव्हा ते विशेष भावते. हे सत्य मला असेच भावले आहे. राहिला मुद्दा तो राजकारण्यांना प्रत्यक्ष सहभागी करुन घ्यावे की घेवू नये, यावर अनेक मतेमतांतरे आहेत. आणीबाणीचा काळ वेगळा होता. सरकार विरुद्ध भूमिका मांडणे हे तर धाडसाचे होते. दुर्गाबाईंचा विरोध हा आणीबाणीला होता. म्हणून त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना विरोध केला होता. त्यावेळी ती भूमिका बरोबर होती. परंतु सरधोपटपणे राजकारण्यांना विरोध करणे चुकीचेच आहे. राजकारणातही साहित्यिक आहेत, साहित्यप्रेमी आहेत. त्यांच्या सहभागाशिवाय रंगतही नाही, हे वास्तव मी औरंगाबादच्या साहित्य संमेलनात अनुभवले आहे. ते माझ्या कायम स्मरणातही आहे.
– भास्कर कदम, माजी नगराध्यक्ष नांदगाव. भ्रमणध्वनी – ९४२३१२७८००

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अंगारकीला बाप्पा पावला! उघडले सिद्धीविनायकाचे मंदिर (घ्या Live दर्शन)

Next Post

अनेक व्याधींनीग्रस्त ते थेट आयर्नमॅन! भगर उद्योजक यांचा जबराट यशोप्रवास (व्हिडिओ)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तान क्रिकेट संघाने थेट आशिया कपमधून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय

सप्टेंबर 17, 2025
Untitled 23
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये महाराष्ट्र चेंबरतर्फे शनिवारी शासकीय योजना आणि व्यवसायाच्या संधी विषयावर सेमिनार…

सप्टेंबर 17, 2025
mukt
संमिश्र वार्ता

महाज्ञानदीप’ पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू

सप्टेंबर 17, 2025
crime 88
क्राईम डायरी

दुमजली माडीचे कौले काढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 17, 2025
accident 11
क्राईम डायरी

गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून दांम्पत्य पडले…६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 17, 2025
crime114
क्राईम डायरी

कर्जदारास बंदुकीचा धाक दाखवून सावकाराने केले अपहरण…व्याजासह मुद्दल परत करुनही घडला प्रकार

सप्टेंबर 17, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
संमिश्र वार्ता

राज ठाकरे यांनी अमित शाह, जय शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून केला हल्लाबोल…

सप्टेंबर 17, 2025
e vidhya 1024x275 1 e1758078658915
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या

सप्टेंबर 17, 2025
Next Post
mahendra

अनेक व्याधींनीग्रस्त ते थेट आयर्नमॅन! भगर उद्योजक यांचा जबराट यशोप्रवास (व्हिडिओ)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011