सोमवार, ऑक्टोबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सध्या १९६ भारतीय भाषा सध्या धोकादायक स्थितीत, उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता

जुलै 4, 2021 | 8:45 am
in राष्ट्रीय
0
uprashtrapati

नवी दिल्ली – दर दोन आठवड्यात, जगातील एक भाषा अस्तंगत होत असते, या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालाचा हवाला देत, उपराष्ट्रपतीएम व्यंकय्या नायडू यांनी  सध्या १९६ भारतीय भाषा सध्या धोकादायक स्थितीत असल्याचे सांगत चिंता व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले की, ही स्थिती बदलून, या भाषा जतन करण्यासाठी ठोस कृती आणि एकत्रित प्रयत्नांची गरज आहेत. सगळे भारतीय एकत्र होऊन आपल्या भाषांचे जतन करतील, अशी आशाही व्यक्त केली.
सिंगापूर येथील सांस्कृतिक संघटना, श्री सांस्कृतिक कलासारधीने आयोजित केलेल्या, ‘आंतरजातीय सांस्कृतिक संमेलन-२०२१’ या वर्धापन दिन कार्यक्रमाला उपराष्ट्रपतींनी आभासी स्वरूपात संबोधित केले अनिवासी, परदेशस्थ भारतीय आपल्या संस्कृतीचे दूत आहेत, असे सांगत, भारतीय मूल्ये आणि परंपरा जिवंत ठेवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे उपराष्ट्रपतींनी कौतुक केले. आपली प्राचीन मूल्ये जगभर घेऊन जाण्याच्या त्यांच्या या प्रयत्नांचा भारताला अभिमान आहे, असे ते म्हणाले.
आपल्या भाषा जतन करण्यावर विशेष भर देत, नायडू म्हणाले की प्राथमिक आणि माध्यमिक स्तरापर्यंत तरी, आपण मातृभाषेतूनच शिक्षण दिले पाहिजे. आपल्या तंत्रशिक्षणातही, हळूहळू भाषेचा वापर वाढवावा, असा सल्ला त्यांनी दिला. प्रशासन आणि न्यायालच्या कामकाजातही त्या प्रदेशातील स्थानिक भाषेचाच वापर करावा, अशी सूचना त्यांनी केली. प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान असावा, आणि आपण मातृभाषेतच, आपल्या कुटुंब आणि समुदायाशी संवाद साधायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
युनेस्कोनुसार, संस्कृतीची व्याख्या, म्हणजे केवळ कला आणि साहित्य नाही, तर आपली जीवनशैली, एकत्र जगण्याची पद्धत, मूल्यव्यवस्था आणि परंपरा याही संस्कृतीचाच भाग असतात. भारतीय संस्कृतीचा जागतिक मानवतावादी आणि निसर्गाविषयीचा दृष्टीकोन एकमेवाद्वितीय आहे, असे नायडू म्हणाले. निसर्गसंवर्धन हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. आपल्या परंपरांमध्ये वृक्ष, नद्या, वन्यजीव आणि पशुंची पूजा सांगितली आहे. तसेच, भारतीय मूल्ये संपूर्ण विश्वाला एकच कुटुंब मानतात. ‘एकमेकांसोबत जागा आणि एकमेकांची काळजी घ्या’ असा संदेश देणारे आपले भारतीय तत्वज्ञान आपण कधीही विसरता कामा नये, असे नायडू म्हणाले.
कोविड-19 मुळे लोकांमधील मानसिक ताणतणाव वाढले आहेत, अशावेळी आध्यात्मिक उपायांनी ते कमी करता येऊ शकेल, असे उपराष्ट्रपती म्हणाले. समाजातील हा ताणतणाव कमी करण्यासाठी धर्म आणि अध्यात्मिक गुरुंनी लोकांपर्यंत पोचायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारत हे अनेक भाषा आणि संस्कृतींचे घर आहे, असे नमूद करत, नायडू यांनी आपल्या विविधतेतील एकता या संस्कृतीवर भर दिला. या संस्कृतीनेच आपल्याला घट्ट बांधून ठेवले आहे, असे ते म्हणाले. भाषेतील विविधता या महान संस्कृतीचा पाया असून, आपली सांस्कृतिक मूल्ये आपण आपल्या भाषा, संगीत, कला, क्रीडा आणि उत्सव यातूनच व्यक्त करत असतो. ”राजकीय सीमा बदलू शकतात, मात्र आपल्या मातृभाषा आणि आपली मुळे कधीही बदलत नाहीत.”  असे सांगत, म्हणूनच आपण भाषा जतन केल्या पाहिजेत असे नायडू म्हणाले. आपण आपल्या भाषा आणि परंपरांचे जतन करणे तर महत्वाचे आहेच, शिवाय, इतर भाषा आणि संस्कृतींचा सन्मान ठेवणेही तेवढेच महत्वाचे आहे, असेही उपराष्ट्रपती म्हणाले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारतीय लस कोवॅक्सिनवरुन ब्राझिलमध्ये वातावरण तापले; राष्ट्रपती बोलसानारो अडचणीत

Next Post

मारुतीच्या या कारची विक्री वाढली तब्बल १८२ टक्के; असं काय आहे तिच्यात?

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
ER6mNMtWAAAgek6

मारुतीच्या या कारची विक्री वाढली तब्बल १८२ टक्के; असं काय आहे तिच्यात?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011