शनिवार, सप्टेंबर 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सध्या १९६ भारतीय भाषा सध्या धोकादायक स्थितीत, उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता

by Gautam Sancheti
जुलै 4, 2021 | 8:45 am
in राष्ट्रीय
0
uprashtrapati

नवी दिल्ली – दर दोन आठवड्यात, जगातील एक भाषा अस्तंगत होत असते, या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालाचा हवाला देत, उपराष्ट्रपतीएम व्यंकय्या नायडू यांनी  सध्या १९६ भारतीय भाषा सध्या धोकादायक स्थितीत असल्याचे सांगत चिंता व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले की, ही स्थिती बदलून, या भाषा जतन करण्यासाठी ठोस कृती आणि एकत्रित प्रयत्नांची गरज आहेत. सगळे भारतीय एकत्र होऊन आपल्या भाषांचे जतन करतील, अशी आशाही व्यक्त केली.
सिंगापूर येथील सांस्कृतिक संघटना, श्री सांस्कृतिक कलासारधीने आयोजित केलेल्या, ‘आंतरजातीय सांस्कृतिक संमेलन-२०२१’ या वर्धापन दिन कार्यक्रमाला उपराष्ट्रपतींनी आभासी स्वरूपात संबोधित केले अनिवासी, परदेशस्थ भारतीय आपल्या संस्कृतीचे दूत आहेत, असे सांगत, भारतीय मूल्ये आणि परंपरा जिवंत ठेवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे उपराष्ट्रपतींनी कौतुक केले. आपली प्राचीन मूल्ये जगभर घेऊन जाण्याच्या त्यांच्या या प्रयत्नांचा भारताला अभिमान आहे, असे ते म्हणाले.
आपल्या भाषा जतन करण्यावर विशेष भर देत, नायडू म्हणाले की प्राथमिक आणि माध्यमिक स्तरापर्यंत तरी, आपण मातृभाषेतूनच शिक्षण दिले पाहिजे. आपल्या तंत्रशिक्षणातही, हळूहळू भाषेचा वापर वाढवावा, असा सल्ला त्यांनी दिला. प्रशासन आणि न्यायालच्या कामकाजातही त्या प्रदेशातील स्थानिक भाषेचाच वापर करावा, अशी सूचना त्यांनी केली. प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान असावा, आणि आपण मातृभाषेतच, आपल्या कुटुंब आणि समुदायाशी संवाद साधायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
युनेस्कोनुसार, संस्कृतीची व्याख्या, म्हणजे केवळ कला आणि साहित्य नाही, तर आपली जीवनशैली, एकत्र जगण्याची पद्धत, मूल्यव्यवस्था आणि परंपरा याही संस्कृतीचाच भाग असतात. भारतीय संस्कृतीचा जागतिक मानवतावादी आणि निसर्गाविषयीचा दृष्टीकोन एकमेवाद्वितीय आहे, असे नायडू म्हणाले. निसर्गसंवर्धन हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. आपल्या परंपरांमध्ये वृक्ष, नद्या, वन्यजीव आणि पशुंची पूजा सांगितली आहे. तसेच, भारतीय मूल्ये संपूर्ण विश्वाला एकच कुटुंब मानतात. ‘एकमेकांसोबत जागा आणि एकमेकांची काळजी घ्या’ असा संदेश देणारे आपले भारतीय तत्वज्ञान आपण कधीही विसरता कामा नये, असे नायडू म्हणाले.
कोविड-19 मुळे लोकांमधील मानसिक ताणतणाव वाढले आहेत, अशावेळी आध्यात्मिक उपायांनी ते कमी करता येऊ शकेल, असे उपराष्ट्रपती म्हणाले. समाजातील हा ताणतणाव कमी करण्यासाठी धर्म आणि अध्यात्मिक गुरुंनी लोकांपर्यंत पोचायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारत हे अनेक भाषा आणि संस्कृतींचे घर आहे, असे नमूद करत, नायडू यांनी आपल्या विविधतेतील एकता या संस्कृतीवर भर दिला. या संस्कृतीनेच आपल्याला घट्ट बांधून ठेवले आहे, असे ते म्हणाले. भाषेतील विविधता या महान संस्कृतीचा पाया असून, आपली सांस्कृतिक मूल्ये आपण आपल्या भाषा, संगीत, कला, क्रीडा आणि उत्सव यातूनच व्यक्त करत असतो. ”राजकीय सीमा बदलू शकतात, मात्र आपल्या मातृभाषा आणि आपली मुळे कधीही बदलत नाहीत.”  असे सांगत, म्हणूनच आपण भाषा जतन केल्या पाहिजेत असे नायडू म्हणाले. आपण आपल्या भाषा आणि परंपरांचे जतन करणे तर महत्वाचे आहेच, शिवाय, इतर भाषा आणि संस्कृतींचा सन्मान ठेवणेही तेवढेच महत्वाचे आहे, असेही उपराष्ट्रपती म्हणाले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारतीय लस कोवॅक्सिनवरुन ब्राझिलमध्ये वातावरण तापले; राष्ट्रपती बोलसानारो अडचणीत

Next Post

मारुतीच्या या कारची विक्री वाढली तब्बल १८२ टक्के; असं काय आहे तिच्यात?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना आरोग्याच्या तक्रारी भेडसावतील, जाणून घ्या, शनिवार, २० सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 19, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा मंत्री समिती गठीत…या सात मंत्र्यांचा समावेश

सप्टेंबर 19, 2025
IMG 20250919 WA0342 1
स्थानिक बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या अभियानात ७० हजारांचे उद्दिष्ट असतांना केली इतक्या झाडांची लागवड

सप्टेंबर 19, 2025
bbd creative
संमिश्र वार्ता

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये हे ५जी स्‍मार्टफोन सवलतीची दरात….

सप्टेंबर 19, 2025
IMG 20250919 WA0307 e1758286066150
स्थानिक बातम्या

एफडीएने नाशिकमध्ये १ लाख २५ हजारचा तुपाचा साठा केला जप्त…

सप्टेंबर 19, 2025
Untitled 29
संमिश्र वार्ता

पावसाळ्याच्या विश्रांतीनंतर चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरु….

सप्टेंबर 19, 2025
crime 12
क्राईम डायरी

मुलींपाठोपाठ अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचेही प्रमाण वाढले…वेगवेगळया भागात तीन घटना

सप्टेंबर 19, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1
संमिश्र वार्ता

आता लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये मिळवण्यासाठी e-KYC बंधनकारक…अशी पूर्ण करा प्रक्रिया

सप्टेंबर 19, 2025
Next Post
ER6mNMtWAAAgek6

मारुतीच्या या कारची विक्री वाढली तब्बल १८२ टक्के; असं काय आहे तिच्यात?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011