शुक्रवार, ऑक्टोबर 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारताने आशिया कप जिंकला…अंतिम चुरशीच्या सामन्यात पाकिस्तानचा केला पराभव

सप्टेंबर 29, 2025 | 7:03 am
in मुख्य बातमी
0
Untitled 46

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आशिया कप स्पर्धेत सुपर ४ नंतर तिसऱ्यांदा भारत – पाकिस्तान हे दोन्ही संघ रविवारी आमनेसामने भिडले. या दोन्ही संघात झालेला अंतिम सामना चुरशीचा झाला. याआधी टीम इंडियाने दोन सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर अंतिम सामन्यातही भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करत आशिया कप पटकावला. भारताने ५ गडी आणि २ चेंडू राखून पाकिस्तानला धूळ चराली. या विजयासह आशिया कप स्पर्धेत नवव्यांदा नाक कोरलं तसेच गटविजेत्याचं टायटल कायम ठेवलं. पण, या अंतिम सामन्याच्या विजयानंतर प्रेझेंटनश सेरेमनीत टीम इंडियाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हातून ट्रॅाफी घेण्यास नकार दिला. त्यामुळे हा पुरस्कार सोहळा संघाला ट्रॅाफी न घेताच संपला. दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळा पोस्ट करुन टीम इंडियाचे अभिनंदन केले. त्यात त्यांनी म्हटले की टीम इंडियाचे अभिनंदन खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर. निकाल तोच..विजय..आपल्या क्रिकेटपटूंना हार्दिक शुभेच्छा….

या अंतिम सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी १४७ धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान २ चेंडूआधी ५ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले टीम इंडियाने १९.४ ओव्हरमध्ये ५ विकेट्स गमावून १५० धावा केल्या. टीम इंडियाच्या या विजयात तिलक वर्मा, शिवम दुबे व्यतिरिक्त संजू सॅमसन याने बॅटिंगने निर्णायक भूमिका बजावली. टीम इंडियाची विजयी धावांचा पाठलाग करताना निराशाजनक सुरुवात झाली. गेल्या ३ सामन्यांमध्ये अर्धशतकाची हॅटट्रिक लगावणारा अभिषेक शर्मा पाकिस्तान विरुद्ध अपयशी ठरला. अभिषेक दुसऱ्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर ५ रन्सवर आऊट झाला. कॅप्टन सूर्याने पुन्हा निराशा केली. सूर्याने १ धाव केली. तर उपकर्णधार शुबमन गिल १२ धावा करुन माघारी परतला. त्यामुळे टीम इंडियाची ४ ओव्हरनंतर ३ आऊट २० अशी स्थिती झाली. त्यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या जोडीने चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला. मात्र अब्रार अहमद याने ही जोडी फोडली. अब्रारने संजूला आऊट करत ही जोडी फोडली. तिलक-संजूने चौथ्या विकेटसाठी ५७ रन्सची पार्टनरशीप केली. संजूने २१ बॉलमध्ये २४ रन्स केले. संजूनंतर तिलकची साथ देण्यासाठी शिवम दुबे मैदानात आला. तिलक आणि शिवम जोडीने निर्णायक भागीदारी केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६० रन्सची पार्टनरशीप केली. या जोडीने फटकेबाजी करत टीम इंडियाच्या बाजूने सामना झुकवला. या जोडीला भारताला विजयी करुन नाबाद परतण्याची संधी होती. मात्र शिवम निर्णायक क्षणी आऊट झाला. शिवमने २२ बॉलमध्ये २ सिक्स आणि २ फोरसह ३३ रन्स केले.

शिवमनंतर रिंकु सिंह मैदानात आला. रिंकु मैदानात आला तेव्हा भारताला १० धावांची गरज होती. तिलकने यापैकी काही धावा केल्या. तर रिंकुने त्याच्या खेळीतील पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत भारताला विजयी केलं. रिंकु ४ धावांवर नाबाद परतला. तर तिलकने ५३ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने सर्वाधिक आणि नाबाद ६९ धावा केल्या. पाकिस्तानसाठी फहीम अश्रफ याने ३ विकेट्स मिळवल्या. तर अब्रार आणि शाहिन आफ्रिदी या दोघांनी प्रत्येकी १-१ विकेट मिळवली. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.

त्याआधी कॅप्टन सूर्याने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानसाठी टॉप ३ फलंदाजांनी उल्लेखनीय खेळी केली. पण, टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी कमाल करत पाकिस्तानला १९.१ ओव्हरमध्ये १४६ रन्सवर ऑल आऊट केले त्यानंतर भारताने हे आव्हान २ चेंडूआधी ५ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. टीम इंडियाने १९.४ ओव्हरमध्ये ५ विकेट्स गमावून १५० धावा केल्या.

G19BRyJWgAAv7vl
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारत – पाकिस्तानमधील अंतिम सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग दाखवणार नाही…ठाकरे गटाच्या विरोधानंतर पीव्हीआरचा निर्णय

Next Post

या व्यक्तींनी वादग्रस्त मुद्दे टाळावे, जाणून घ्या, सोमवार, २९ सप्टेंबरचे राशिभविष्य

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Home Flat e1681892298444
मुख्य बातमी

घरकुल बांधणीत या जिल्ह्याने रचला नवा विक्रम! ५० हजारांहून अधिक घरकुलांची पूर्ती…

ऑक्टोबर 22, 2025
PIC1OG8A
महत्त्वाच्या बातम्या

स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला लष्कराचा मिळाला हा बहुमान… गोल्डन बॉय आता या पदवीने ओळखला जाणार… 

ऑक्टोबर 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा भाऊबीजेचा दिवस… जाणून घ्या, गुरुवार, २३ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 22, 2025
IMG 20210302 WA0026
संमिश्र वार्ता

दिवाळीनंतर फिरायला जायचंय? या बीचवर नक्की जा… येथील अभूतपूर्व नजारा पाहून खुशच व्हाल…

ऑक्टोबर 22, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय… काढला हा शासनादेश… अशी मिळणार मदत…

ऑक्टोबर 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा दिवाळी पाडव्याचा दिवस… जाणून घ्या, बुधवार, २२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 21, 2025
diwali padva balipratipada
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा- असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 21, 2025
Untitled 42
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीत या ११ गोष्टी लक्षात ठेवा… ज्योतिष शास्त्री प्रशांत चौधरी यांनी दिल्या या टीप्स…

ऑक्टोबर 21, 2025
Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी वादग्रस्त मुद्दे टाळावे, जाणून घ्या, सोमवार, २९ सप्टेंबरचे राशिभविष्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011