सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‌‘एनडीए‌’पाठोपाठ ‌‘इंडिया‌’ आघाडीतही फूट…या निवडणुकीत ‌‘आप‌’ ची स्वबळाची घोषणा

by India Darpan
जून 14, 2025 | 5:55 am
in संमिश्र वार्ता
0
arvind kejrival


नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधकांच्या ‌‘इंडिया‌’ आघाडीला एकामागून एक धक्के बसत आहेत. आता आगामी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‌‘आम आदमी पक्षा‌’ने स्वबळावर सर्व जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ‌‘आप‌’चे नेते सौरभ भारद्वाज यांनी बुधवारी ही माहिती दिली. यामुळे ‌‘इंडिया‌’ आघाडीला आणखी एक धक्का मानला जात आहे.

भारद्वाज म्हणाले, की गुजरातमध्ये पाच जागांवर पोटनिवडणुका होणार होत्या, त्यापैकी काँग्रेसने जिंकलेल्या चार जागा होत्या, तर एक जागा आम्ही जिंकलेली होती. जिथे त्यांचा उमेदवार जिंकला होता, तिथे ते निवडणूक लढवतील आणि जिथे आमचा उमेदवार जिंकला होता, तिथे आम्ही निवडणूक लढवू, असे ठरले होते. त्यांच्या चार जागांवर आम्ही निवडणूक लढवली नाही; पण जेव्हा पाचव्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली, तेव्हा काँग्रेसने आपला उमेदवार उभा केला. मला वाटते, की हा युतीचा धर्म नाही. बिहारमध्ये आम्ही स्वबळावर निवडणूक लढवत आहोत; पण शेवटी पक्षातील मोठे नेते जो काही निर्णय घेतील, तो आम्ही मान्य करू.

ते पुढे म्हणाले, की दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने बिहारमधील लोकांचा रोजगार उद्ध्वस्त केला जातो. त्यांची घरे बुलडोझरने पाडली जात आहेत. असे म्हणता येईल, की बिहारमधील लोकांना बिहारमध्ये परत हाकलून लावले जात आहे. जर भारतीय जनता पक्ष बिहारमधील लोकांना हाकलून लावू शकतो, तर बिहारमधील लोक भारतीय जनता पक्षाला राज्यातून हाकलून लावू शकतात. भारतीय जनता पक्षाचे धोरण खोटे बोलणे आहे. भाजपवाले खोट्या गोष्टी वारंवार सांगतात. त्यामुळे तुमचा खोट्यावर विश्वास बसतो. ३१ मे रोजी सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या होत्या, की एकही झोपडपट्टी पाडली जाणार नाही; पण दुसऱ्याच दिवशी मद्रासी कॅम्पमध्ये सुमारे ८०० झोपडपट्ट्या पाडल्या गेल्या, हे भाजपचे धोरण आहे, अशी टीकाही भारद्वाज यांनी या वेळी केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सर्व शाळा सोमवारी सुरु होणार …विद्यार्थ्यांचे असे होणार स्वागत…मंत्री भुसे यांचे शिक्षण विभागाला निर्देश

Next Post

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी समिती स्थापन करणार….

Next Post
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी समिती स्थापन करणार 1 1024x806 1

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी समिती स्थापन करणार….

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
cm eknath shinde 1 e1704958478974

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना…

जून 15, 2025
Screenshot 20250615 200323 Collage Maker GridArt

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही माहिती….

जून 15, 2025
st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
20250615 e1749988376127

या जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट…रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011