मंगळवार, ऑक्टोबर 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

तुम्ही इलेक्ट्रिक वाहन घेताय का? सर्वप्रथम हे वाचा…

सप्टेंबर 25, 2021 | 5:12 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


मुंबई – पेट्रोल डिझेल सारख्या इंधनाचे दर गगनाला भिडल्याने सध्याच्या काळात अनेकांचा इलेक्ट्रिक वाहन घेण्याकडे कल वाढला आहे. मात्र ज्याप्रमाणे पेट्रोल-डिझेल पासून निघणाऱ्या धुरामुळे आणि विषारी वायु प्रदूषणाची पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहनातील बॅटरी मुळे देखील भविष्यात मोठ्या प्रमाणावर ई – कचरा वाढून त्याची विल्हेवाट लावणे अत्यंत कठीण होणार असून पर्यावरण दृष्टीने देखील घातक ठरणार आहे. याची प्रचिती नवी दिल्लीसह अनेक शहरात येऊ लागली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक घेण्यापूर्वी याचा सर्वांनी विचार करणे आवश्यक आहे.

सध्या दिल्लीत इलेक्ट्रिक वाहनांमुळे लोकांचा प्रवास सुलभ आणि स्वस्त झाला आहे, परंतु त्यांच्या बॅटरी खराब झाल्यामुळे त्याचा ई-कचरा हा पर्यावरणासाठी धोकादायक ठरत आहेत. कारण या लिथियम-आयन बॅटरीजची साठवण आणि विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही योग्य व्यवस्था नाही. वास्तविक ई-कचरा व्यवस्थापन नियम 2001 अंतर्गत सर्व नियम आणि कायदे अधिसूचित केले गेले आहेत, परंतु अंमलबजावणीच्या अभावामुळे सर्व काही कागदावरच आहे. ई-वेस्ट मॅनेजमेंट पार्क उभारण्याच्या दिशेने बैठकाही सुरू आहेत, परंतु सध्या तरी कोणताही मार्ग निघताना दिसत नाही.

पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या चिंतन या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालानुसार, ई-वाहनांच्या बॅटरीचे सरासरी आयुष्य साडेसहा ते सात वर्षे असते. दिल्लीमध्ये इलेक्ट्रिक व्हेइकल पॉलिसी 2020 अधिसूचित करण्यात आली आहे. 2022 पर्यंत 1400 इलेक्ट्रिक बसेस शहरात येण्याची शक्यता आहे. या बसच्या एका बॅटरीचे वजन सुमारे 1,500 किलो आहे. त्यानुसार, सात वर्षांनंतर या बसमधून बॅटरीच्या स्वरूपात 21 हजार टन कचरा गोळा केला जाईल. आताही ई-रिक्षासह इतर अनेक वाहनांच्या बॅटरी त्याच पद्धतीने टाकल्या जात आहेत.

एका अहवालानुसार, वाहनांच्या बॅटरी लिथियम आयनच्या आहेत. जर ते सुरक्षितपणे गोळा, साठवले आणि विल्हेवाट लावले नाहीत, तर त्यातून बाहेर पडणारी रसायने केवळ हवा आणि पाणीच नव्हे तर माती देखील प्रदूषित करतात. पर्यावरण तज्ज्ञांनी गंभीरपणे ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या बॅटरीच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रभावी यंत्रणा आखली पाहिजे.

एकीकडे सध्या दिल्लीतील समयपूर, सिरसपूर, नवीन मुस्तफाबाद, मांडोली, तिस हजारी, बहादूरगड या सह अनेक भागात जुन्या बॅटरीचा अवैध धंदा जोरात सुरु आहे. तर दुसरीकडे ई-कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी दिल्लीमध्ये ई-कचरा व्यवस्थापन पार्क उभारण्याचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयासोबत उपराज्यपाल अनिल बैजल यांची बैठकही झाली आहे. मुख्य सचिव विजय देव यांनी पर्यावरण विभागाला या पार्कसाठी प्रस्ताव तयार करून योग्य जागा निवडण्यास सांगितले आहे.

नवीन नियमांनुसार बॅटरी उत्पादक केवळ नोंदणीकृत विक्रेत्यांनाच बॅटरी विकतील आणि आयुष्य संपल्यानंतर ते डीलरकडून परत घेतील. सर्व उत्पादक, विक्रेते, घाऊक विक्रेते दिल्लीच्या प्रदूषण नियंत्रण समितीला पर्यंत बॅटरीची संपूर्ण विक्री यादी पाठवतील. तसेच विक्रेते हे निश्चित करतील की गोळा केलेल्या जुन्या बॅटरी केवळ पुनर्वापरासाठी नोंदणीकृत पुनर्वापरकर्त्यांना दिल्या जातील.

विशेष म्हणजे शिसे, बॅटरीचा सर्वात धोकादायक घटक याविषयी जनजागृती केली जाईल आणि जनतेला सदोष बॅटरी फक्त अधिकृत विक्रेत्याला विकण्यास सांगितले जाईल. यासंदर्भात काही नियमांचे उल्लंघन झाल्यास ते डीपीसीसी आणि केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या निदर्शनास आणाले जाईल. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर डीपीसीसीने कारवाई केली आहे. सध्या दिल्लीत ई वाहने आता सीएनजीपेक्षा जास्त विकली जात आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बेडरूम मध्ये हे घडलं आणि पत्नीने थेट पोलिसांनाच बोलावलं!

Next Post

तुम्हाला माहित आहे का? केरळी नागरीक मांजरींना जास्त का घाबरतात!

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Maha Gov logo 07 1 1024x512 1
मुख्य बातमी

बंपर दिवाळी भेट… एकाचवेळी ४७ महसूल अधिकाऱ्यांना बढती… बघा संपूर्ण यादी…

ऑक्टोबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा लक्ष्मीपूजनाचा दिवस… जाणून घ्या, मंगळवार, २१ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 20, 2025
rape
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरात महिला विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ… या तीन ठिकाणी गुन्हे दाखल…

ऑक्टोबर 20, 2025
Untitled 79
महत्त्वाच्या बातम्या

आज आहे लक्ष्मीपूजन! असे आहे मुहूर्त… अशी करा पूजा…

ऑक्टोबर 20, 2025
Diwali22
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – जगभर अशी साजरी होते दिवाळी! देशोदेशी अशा आहेत विविध प्रथा

ऑक्टोबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा नरक चतुर्दशीचा दिवस… जाणून घ्या, सोमवार, २० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 19, 2025
indian army e1750762947859
महत्त्वाच्या बातम्या

सुवर्णसंधी! भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? येथे मिळेल मोफत प्रशिक्षण…

ऑक्टोबर 19, 2025
messi
महत्त्वाच्या बातम्या

स्वप्न सत्यात येणार… फुटबॉल सम्राट मेस्सीसोबत खेळण्याची सुवर्णसंधी… युवा फुटबॉलपटूंनो फक्त हे करा…

ऑक्टोबर 19, 2025
Next Post
cat2

तुम्हाला माहित आहे का? केरळी नागरीक मांजरींना जास्त का घाबरतात!

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011