नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज दिल्लीतील एम्स ट्रॉमा सेंटरला भेट देऊन छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा टेकड्यांमध्ये नक्षलविरोधी कारवाईत जखमी झालेल्या सुरक्षा दल जवानांची भेट घेतली. या कारवाईत ३१ नक्षलवादी ठार झाले.
आमचे सुरक्षा दल त्यांच्या शौर्याने नक्षलवादाच्या खुणा पुसून टाकत आहेत, असे एक्स या समाज माध्यमावरच्या एका संदेशात अमित शाह यांनी लिहिले आहे. आज त्यांनी दिल्लीतील एम्स ट्रॉमा सेंटरला भेट देऊन छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा टेकड्यांमध्ये झालेल्या नक्षलविरोधी कारवाईत जखमी झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची भेट घेतली. या कारवाईत ३१ नक्षलवादी ठार झाले झाले होते. केंद्रीय गृहमंत्र्यांनी या सुरक्षा दल कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि राष्ट्राला त्यांच्यावर असलेल्या विश्वासाची आणि अभिमानाची ग्वाही दिली.
या शूर सैनिकांनी छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर सलग 21 दिवस मोहीम राबवली यात 31 नक्षलवादी ठार झाले, असे अमित शाह म्हणाले. संपूर्ण देशाला या सैनिकांच्या शौर्याचा आणि धाडसाचा अभिमान आहे, असेही ते म्हणाले.