नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक / व्यक्ती यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2023-24 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार या विविध पुरस्कारांची शासनाने घोषणा केली आहे. त्यामध्ये राज्यातील एकूण १३० पुरस्कारार्थ्यांची निवड या पुरस्काराकरीता करण्यात आलेली आहे.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह, नरीमन पॉइंट, येथे दिनांक १० जून रोजी सकाळी १० वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय शिरसाठ, सामाजिक न्याय विभाग राज्यमंत्री माधुरी ताई मिसाळ, खासदार अरविंद सावंत या मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे.
राज्यातील एकूण १३० पुरस्कारार्थ्यांची निवड या विविध पुरस्काराकरीता करण्यात आलेली आहे. त्यामध्ये ९० व्यक्ती व ४० संस्थांचा समावेश आहे. त्यात नाशिक विभागातील ९ व्यक्ती व ९ संस्थांचा असा एकूण १८ जणाचा समावेश आहे. त्यामध्ये नाशिक जिल्हा (५- व्यक्ती, १-संस्था ), धुळे जिल्हा (२ -संस्था ), जळगाव जिल्हा (१- व्यक्ती, ५-संस्था ), आहील्यानगर जिल्हा (३- व्यक्ती,) याप्रमाणे समावेश आहे. नाशिकचे श्री सुभाष बोराडे ,व श्री रामभाऊ पठारे या दोन व्यक्तीना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण तर श्री रमेश आरणे ,श्रीमती कावेरी देवरे ,श्री सुधाकर आनंद इंस्ते या तीन व्यक्तीना तर तुळजाभवानी बहुदेशीय सेवाभावी संस्था नाशिक यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार जाह्रीर झाला आहे.
सदर पुरस्कारासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. पुरस्कारासाठी निवड झालेल्या व्यक्तींना मुंबई येथे कार्यक्रम ठिकाणी घेऊन जाणे यासाठी संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. पुरस्कारार्थी यांची निवास,भोजन व मुंबई दर्शनाची शासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व पुरस्कारार्थी यांचे राज्यातील समाज कल्याण विभागाचे समाज कल्याण अधिकारी प्रत्यक्ष पुरस्कारार्थी यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन करीत आहेत.
जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्था याची माहिती पुढील प्रमाणे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार 61 व्यक्तीं -(प्रत्येकी रु.७५०००), व १ृ संस्था ( प्रती संस्था प्रत्येकी रु. १ लाख) .साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार २७ व्यक्तीं (प्रत्येकी रु.७५०००), व ६ संस्था ( प्रती संस्था प्रत्येकी रु. १ लाख).कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कार १ व्यक्तीं -(प्रत्येकी रु.५१ हजार), व १ संस्था ( प्रती संस्था प्रत्येकी रु. १ लाख).संत रविदास पुरस्कार १ व्यक्तीं -(प्रत्येकी रु.५१,000/-), व १ संस्था ( प्रती संस्था प्रत्येकी रु. २ लाख).शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक एकूण १४ संस्थेला ६ महसुली विभागानूसार प्रत्येकी दोन संस्था रु ७.५० लक्ष सन्मानपत्र , मानपत्रासाठी चांदीचा स्क्रोल,स्मृतीचिन्ह , शाल, व श्रीफळ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार ८ संस्था , राज्यस्तर ३ पुरस्कार प्रथम पुरस्कार ५ लक्ष, द्वितीय पुरस्कार -३ लक्ष व तृतिय पुरस्कार -२ लक्ष विभागीय स्तरावर पुरस्कार संख्या ५,प्रत्येकी रु.१ लक्ष. याप्रमाणे राज्यातील ९० व्यक्ती व ४० संस्थांचा एकूण १३० पुरस्कारार्थ्यांची निवड या विविध पुरस्काराकरीता करण्यात आलेली आहे.
या विविध पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या सर्व पात्र व्यक्ती व संस्थाचे राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री श्री. संजय शिरसाठ ,सामाजिक न्याय विभाग राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ, प्रधान सचिव, श्री हर्षदिप कांबळे, समाज कल्याण आयुक्त, श्री.ओम प्रकाश बकोरिया तसेच विभागातील सर्व प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, सर्व सहाय्य्क आयुक्त, व जिल्हा समाज कल्याण अधिकारी समाज कल्याण यांनी अभिनंदन केले.
राज्यात समाज कल्याण क्षेत्रात मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अन्याय निर्मुलन , जनजागरण इत्यादी क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तींचा या पुरस्काराच्या निमित्ताने गौरव शासनाचे वतीने करण्यात येत आहे. त्यामुळे समाजातील सर्व स्थरातून शासनाचे आभार व्यक्त करून निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमांचे / पुरस्कार वितरण सोहळयाचे नियोजन काटेकोर पद्धतीने होण्यासाठी विभागाचे प्रधान सचिव श्री हर्षदिप कांबळे,, समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी विविध बैठका घेऊन अधिकाऱ्यांना निर्देशित केले आहे.प्रधान सचिव व आयुक्त,समाज कल्याण यांचे मार्गदर्शनाखाली विभागाचे सह सचिव, सोमनाथ बागुल, उपसचिव रविंद्र गोरवे, मुंबई समाज कल्याण प्रादेशिक विभागाचे उपायुक्त श्री. बाळासाहेब सोळंकी व त्यांच्या टीमकडून नियोजन करण्यात येत आहे.
Announcement of various awards of the Social Justice Department