इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले असून यात आपला मोठा धक्का बसला असून भाजपने मुसंडी मारली आहे. जवळपास २७ वर्षांनी भाजप दिल्लीत सत्तेत येणार आहे. पहिल्या सर्व कलांमध्ये भाजप आघाडीवर आहे.
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांमध्ये भाजपने ४६ जागांवर आघाडी घेतली आहे. तर आप २४ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे काँग्रेसचे सर्वात वाईट प्रदर्शन या निवडणुकीत दिसून आले. या निवडणुकीत आपचे अरविंद केजरीवाल सह काही नेते पिछाडीवर आहे.
दरम्यान जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी म्हटले आहे की, अरविंद केजरीवाल विचार, चारित्र्य शुध्द नाही, म्हणूनच आपचा पराभव झाला. त्यांचे जीवन निष्कलंक नव्हते. मतादारांचा विश्वास नव्हता की, हे आमच्यासाठी काही करतील, मी त्यांना वारंवार सांगितले. मात्र त्यांनी एेकलं नाही. केजरीवाल लोकांच्या चारित्र्याबद्दल बोलतात मात्र दारु दुसरीकडे दारु ठेक्यांमध्ये घोटाळे करतात असं लोकांना वाटायाला लागल्याचेही अण्णांनी सांगितले.