रविवार, ऑगस्ट 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करणार…मुख्यमंत्री

by Gautam Sancheti
ऑगस्ट 2, 2025 | 8:30 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20250801 WA0448 1

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे संघर्षमय जीवन, त्यांचे महान कार्य, अजरामर साहित्य जगासमोर येण्याकरिता त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल, याकरीता निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासित करुन अण्णा भाऊ साठे यांनी दाखविलेल्या मार्गावर राज्य शासन मार्गक्रमण करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यखंड क्रमांक ५, ६ आणि ७ च्या साहित्य प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगर विकास राज्य मंत्री माधुरी मिसाळ, आमदार अमित गोरखे, विजय शिवातारे, सुनील कांबळे, हेमंत रासणे,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणु गोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून क्रांती घडवली, समाजाला तेज, स्फुलिंग दिले. साहित्यातील एक एक व्यक्तीरेखा जिवंत केल्या. यांच्या लिखाणामध्ये करुणा, संवेदना, क्रांती, काव्य आणि एक वैश्विकता पहायला मिळते. अण्णाभाऊचे साहित्य जगातील २२ भाषेत अनुवादित झाले असून त्या-त्या देशात ते प्रसिद्ध आहेत. तसेच देशातील विविध विद्यापीठात त्यांच्या साहित्यांवर संशोधन सुरू आहे. रशिया देशामध्ये त्यांच्याबद्दल असलेला सन्मान, आत्मीयता, त्यांच्या साहित्यावर होणारा अभ्यास बघता अभिमानाने ऊर भरुन येतो, भारत मातेचा आणि मराठी मातेचा या सुपुत्राचे साहित्य खऱ्याअर्थांने वैश्विक झाले आहे.

अण्णा भाऊंनी कथा, कादंबरी, लोकनाट्य नाटक, सिनेमा पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास दर्शन अशा प्रकारे साहित्यातील प्रत्येक अंगात बहारदारपणे आणले आहेत. त्यांनी ४९ वर्षाच्या आयुष्यात ४० पेक्षा अधिक कादंबऱ्या आणि विविध प्रकारच्या रचना लिहणारे विलक्षण प्रकारचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या साहित्यावर आज हजारो लोक पीएचडी करीत आहेत. खऱ्या अर्थाने ते एक चालते बोलते विद्यापीठ होते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

संताच्या मांदियाळींनी समाजाच्या विषमतेवर प्रहार करतांना समाजामध्ये सुधारणा करुन एकत्रित करण्याचा प्रयत्न केला, अण्णाभाऊंनी त्याच भावनेने तत्कालीन समाज व्यवस्थेची मांडणी करतांना आंर्तभावना, वेदना, संवेदना दर्शवितांना कुठेही कटुता आणली नाही, साहित्य समाजाला एकत्रित करणारे साहित्य आहे. संपूर्ण समतायुक्त समाज निर्माण करण्याचे कार्य केले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांच्या पोवाडा, गीतामध्ये तरुणाईला स्फुर्ती देण्याचे काम केले.

रशियात देशात असतांना वीर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीतून आलेलो आहे, याठिकाणी वीरांना वदंन करण्याकरिता आलेलो आहे, असे त्यांनी सांगितले. नैराश्य हे तलवारीवर साचलेले धुळीसारखे असते, धुळ झटकली की तलवार पुन्हा धारधार होते, पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर नाही तर कामगाराच्या तळहातावर उभी आहे, असे प्रेरक विचार त्यांनी दिले.

अण्णाभाऊंच्या संघर्षमय जीवनातून त्यांचे व्यक्तीमत्व मोठे झाले. त्यांच्या लेखणीतून समाजाला दिशा, प्रेरणा, सामान्य माणसाला बळ, वंचिताचा आवाज देण्याचे कार्य केले. त्यांचे हे कार्य समाजासमोर आण्याचे काम सुरू आहे. समाजाची मूलतत्त्वे सांगणारे, संवेदना जीवंत ठेवणारे अशाप्रकारचे अजरामर साहित्य पुढच्या प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे, यादृष्टीने संशोधन झाले पाहिजे. साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाकरिता २५ कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, स्मारकाचे आराखडेही तयार झाले आहेत, येत्याकाळात लवकरात स्मारक पूर्ण करण्यात येईल, याकरिता राज्य शासन सहकार्य करेल, असेही श्री. फडणवीस म्हणाले.

अण्णाभाऊची स्मृती चिरंतर जपण्याकरिता राज्य शासन कटीबद्ध-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतींना अभिवादन करुन श्री. शिंदे म्हणाले, अण्णा भाऊ हे साहित्यिक, शाहिर, लढाऊ व्यक्तीमत्व, प्रस्थापित मराठी साहित्य, संस्कृती, परंपरा नाकारणारे पहिले दलित बंडखोर लेखक होते. त्यांचे साहित्य प्रबोधन व परिवर्तनवादी होते. त्यांनी साहित्यातून समाजातील वंचित, दीनदलित, कष्टकरी, स्त्रिया, भटके यांच्या व्यथा आणि वेदना मांडण्याचे काम केले. त्यांच्या कथा कांदबऱ्यांमध्ये कामगारांचा श्रमाचा पुरस्कार, जमीनदारांचा शोषणांचा धिक्कार होता. अण्णाभाऊच्या जयंतीचे औचित्य साधून कथा, लोकनाट्य, नाटक, शाहिरी, प्रवासवर्णनांचा खंड वाचकासमोर येत असून ही मराठी क्षेत्रातील अतिशय महत्वाची घटना आहे.

महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आणि वारसा शेवटच्या घटकांपर्यत नेण्याचे काम अण्णा भाऊंनी केले. प्रखर बुद्धीवाद, समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व, समाजवादी विचारांच्या वैचारिक साधनेवर त्यांचा साहित्य दृष्टीकोन उभा आहे. त्यांच्या शाहिरीने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला बळ मिळण्यासोबत अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा समाजात निर्माण केली. शेतकरी, पददलित, श्रमिक यांच्या वेदंना हुंकार साहित्यातून मांडला, त्यामुळे अण्णा भाऊंची स्मृती चिरंतर जपण्यासोबतच त्यांची उर्जा समाजाला सतत मिळण्याकरिता राज्य शासन कटीबद्ध आहे, असेही श्री. शिंदे म्हणाले.

कार्यक्रमापूर्वी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले.
यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यखंड क्र. ५, ६ आणि ७ साहित्याविषयी माहिती दिली.

यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे प्रकाशन समितीचे सदस्य डॉ. माधव गादेकर, डॉ. बी.एन. गायकवाड, डॉ. सोमनाथ कदम, डॉ. मिलींद कसबे, शिवा कांबळे, डॉ. प्रमोद गारोडे, डॉ. विजय कुमटेकर उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान…या प्रमुख नेत्यांची उपस्थिती

Next Post

क्रेडाई नाशिक मेट्रोच्या एअरोनॉमिक्स २०२५ मोहिमेचा शुभारंभ….स्वच्छ हवा, शून्य कचरा व सशक्त नाशिकच्या दिशेने मोठे पाऊल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled 42
महत्त्वाच्या बातम्या

बिहारमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी व तेजस्वी यादव यांची मोटरसायकल रॅली…लोकांचा मोठा प्रतिसाद

ऑगस्ट 24, 2025
प्रातिनिधीक छायाचित्र
महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरे यांच्या घरी उध्दव ठाकरे जाणार….सरप्राइज आले समोर

ऑगस्ट 24, 2025
GzFrSrPWAAAt v1
महत्त्वाच्या बातम्या

IADWS ची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पार…संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली माहिती

ऑगस्ट 24, 2025
Untitled 41
संमिश्र वार्ता

विशेष लेख…उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक रंगणार दक्षिण विरुद्ध दक्षिण

ऑगस्ट 24, 2025
crime1
क्राईम डायरी

दुचाकी अडवून चाकूचा वार करुन दोघांनी हॉटेल व्यावसायीकाला लुटले…नाशिकमधील भररस्त्यावरील घटना

ऑगस्ट 24, 2025
ed
संमिश्र वार्ता

ईडीने विशेष न्यायालयाच्या आदेशाने जप्त केलेली ४५.२६ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता केली परत…नेमकं काय आहे प्रकरण

ऑगस्ट 24, 2025
Untitled 40
संमिश्र वार्ता

मराठी लोक भंगार है म्हणणा-या परप्रांतीयला मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप…नाशिकमधील घटना

ऑगस्ट 24, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

शिंदे यांच्या तातडीच्या निरोपानंतर नाराज तानाजी सावंत मुंबईत दाखल, दोन तास चर्चा…नेमकं घडलं काय

ऑगस्ट 24, 2025
Next Post
unnamed 5

क्रेडाई नाशिक मेट्रोच्या एअरोनॉमिक्स २०२५ मोहिमेचा शुभारंभ….स्वच्छ हवा, शून्य कचरा व सशक्त नाशिकच्या दिशेने मोठे पाऊल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011