इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
संतोष देशमुखावर अनैतीक आरोप करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महिलेची हत्या करण्यात आल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितले. ही महिला कळंब शहरातील द्वारका नगर मध्ये राहत होती. ही महिला वेगवेगळ्या नावांनी वावरत होती असेही त्यांनी म्हटले आहे. ही महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचे काम करायची आणि त्यासाठी ती मनीषा आकुसकर आडस, मनीषा बिडवे कळंब, मनीषा मनोज बियाणी कळंब, मनीषा राम उपाडे अंबाजोगाई, मनीषा संजय गोंदवले रत्नागिरी या नावाचा वापर करायची असेही त्यांनी म्हटले आहे.
दमानिया यांनी म्हटले आहे की, या महिलेची ५ दिवसापुर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. कुठल्या कारणाने हत्या झाली अन बीड पोलीसांना ही बातमी कळाली अन ते घटनास्थळी पोहचल्यावर नंतरच तेथील रहिवासी व स्थानिक पोलीसाना कळाली व अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतीक संबधातून हत्या झाली अशी चर्चा सध्या सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या की, या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करीत आहेत. असं असलं तरी शहर आणि परिसरात या घटनेने दहशत पसरली आहे. शहरातील द्वारका नगरीत राहणाऱ्या लोकांना २ दिवसांपासून उग्र वास येत होता. पण ज्या घरातून वास येत होता त्या घराला बाहेरून कुलूप लावलेले होते. दरवाजा तोडून बीड पोलीस व स्थानिक पोलीसानी आत प्रवेश केल्यानंतर संबंधित महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळला. व मृतदेह सडलेला असल्यामुळे जागेवरच मृतदेहाचे पोष्टमार्टम केले व अंत्यविधी ही उरकला या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत असेही अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.