इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मंत्री धनजंय मुंडे यांना बेल्स पाल्सी नावाचा आजार झाला असून या आजारामुळे त्यांना दोन मिनिटंही बोलता येत नाही. याबाबतची माहिती त्यांनीच सोशल मीडियातून दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.त्याच दरम्यान मला Bell’s palsy नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही.
आजाराची ही पोस्ट मुंडे यांनी केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोस्ट टाकत म्हटले आहे की, माझी लढाई त्यांच्या वृत्ती विरुद्ध आहे, त्यांच्या दहशती विरुद्ध आहे, त्यांच्या भ्रष्टाचारा विरुद्ध आहे. ती चालू राहीलच पण त्यांना तब्येती साठी शुभेच्छा.
या पोस्टमध्ये म्हटले आहे की, धनंजय मुंडे यांना Bell’s Palsy झाल्याचे कळले. कोणालाच कधी आजार होऊ नये. ते लवकर बरे व्हावे या साठी शुभेच्छा.
Bell’s Palsy हा एक nerve चा आजार आहे हा कधी स्ट्रेस मुळे व कधी herpes ची साइड रिएक्शन म्हणून होतो. ते लवकर म्हणजे ४ आठवड्यात ठीक होतीलच. (हा माझा विषय आहे म्हणून मी म्हणत आहे). माझी लढाई त्यांच्या वृत्ती विरुद्ध आहे, त्यांच्या दहशती विरुद्ध आहे, त्यांच्या भ्रष्टाचारा विरुद्ध आहे. ती चालू राहीलच पण त्यांना तब्येती साठी शुभेच्छा.