रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक – इच्छा नसतानाही का राजकारणात आल्या आर्किटेक्ट अमृता पवार ? (बघा संपूर्ण मुलाखत)

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 28, 2022 | 2:25 pm
in स्थानिक बातम्या
0
amruta pawar

नाशिक – अध्यात्म, योग, मेडिटेशन हे आपल्या देशाची ताकद आहे. आज आपल्या देशांवर इतकी आक्रमणं झाली पण अध्यात्माला कोणीही धक्का लावू शकले नाही. आपल्या देशाच्या संस्कृतीचे हे एक महत्त्वाचे अंग आहे. ही संस्कृती आपल्याच देशाकडे आहे. त्यामुळे आपण या गोष्टीच ज्ञान घेणं आवश्यक आहे. आयुष्यात अनेक अडचणी येतात पण त्यावर मात करून यशस्वी होण्यासाठी अध्यात्माची कास धरली पाहिजे, असे मत जिल्हा परिषद सदस्या व आर्किटेक्ट अमृता पवार यांनी व्यक्त केले.

इंडिया दर्पण फेसबुक लाईव्हमध्ये त्या बोलत होत्या. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली. अमृता पवार या स्व. माजी खासदार डॉ. वसंतराव पवार यांच्या कन्या असून आर्किटेक्ट आहे. वडिलांचा समाजकारण व राजकारणचा वारसा त्या सक्षमपणे पुढे चालवत आहेत. राजकीय प्रवासविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, बाबा गेल्यानंतर कोणीही राजकारणात जायचं नाही असं आम्ही ठरवलं होतं. मी ऑस्ट्रेलियात शिक्षण घेऊन तिथे प्रॅक्टिस करत होते. सकाळी सहा पासून मी तिकडे कामाला सुरुवात करायचे. तेव्हा बाबा मला कायम म्हणायचे की हेच काम तू आपल्या देशासाठी, शहरासाठी कर. आणि बाबा गेल्यानंतर मला जाणवलं की आपण आपल्या लोकांसाठी काहीतरी काम करायला हवं आणि मी भारतात आले, आणि सुप्रियाताई सुळे भेटल्या आणि मग समाजकारण आणि राजकारणातला प्रवास सुरु झाला. काम करत असताना एक तत्व मी कायम पाळते, समाजकारण महत्वाचे आणि ओघाने राजकारण येतेच, असे त्या म्हणाल्या.

स्वतःचा व्यवसाय सांभाळून त्या राजकारणात कशा सक्रिय आहेत याविषयी त्या बोलल्या की, राजकारण हा हा माझा व्यवसाय नाही. आणि व्यवसाय म्हणून करायचं पण नाही.आज पुढची पिढी माझ्याकडे बघणार आहे तेव्हा मी त्यांच्यासमोर काय आदर्श ठेवते हे महत्त्वाचे आहे. गोदावरी अर्बन को ऑप बँकेच्या चेअरमन म्हणूनही त्या कार्यरत आहेत त्याविषयी त्यांनी सांगितले की, को ऑप बँक ही सहकार तत्वावर चालते. आरबीआय आणि सहकार खातं यांच्या अंतर्गत काम करावे लागते. बऱ्याचदा आरबीआय एक सांगते तर सहकार खातं एक सांगते. आणि लोकांचा आपल्यावर विश्वास असतो. अशावेळी दोघांचा मेळ घालून काम करावे लागते, आणि हे जास्त आव्हानात्मक आहे.

ताण तणावाच्या व्यवस्थापनाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धेच्या काळात ताण येतोच पण मुळातच आध्यत्मिक आवड असल्याने सातत्याने जप, मेडिटेशन करते आणि त्याचा नक्कीच फायदा होतो. अनेकदा रडत बसण्यापेक्षा गोष्टी सोडून द्यावे लागतात, शांत राहून काम करावं लागतं हे मी शिकले. निवृत्तीनाथ मंदिराच्या आर्किटेक्चरच्या अनुभवाविषयी त्यांनी सांगितले की, कुंभमेळ्याच साधुग्राम गेट मी तयार केले होते. आणि ते वारकऱ्यांनी पाहिलं आणि त्यांना ते आवडले. निवृत्तीनाथ मंदिराचा प्रस्ताव माझ्याकडे आल्यावर मी अभ्यासासाठी वेळ मागितला. मंदिराचं एक शास्त्र असतं, मी आणि माझ्या टीमने पुस्तक वाचून पाच ते सहा महिन्यानंतर मी प्लॅन सादर केला. तो त्यांना आवडला आणि ते काम पूर्ण झालं.

महिला सक्षमीकरणाविषयी मत मांडताना त्या म्हणाल्या की, आज राजकारणात ५० टक्के महिला आहेत. महिलांनी न्यूनगंड बाजूला ठेवून आपल्या समस्या पुढे येऊन मांडल्या पाहिजेत. स्वतःसाठी बोललं पाहिजे. भारतीय महिलांमध्ये एकाचवेळी अनेक कामं करण्याची क्षमता असते. तो गुण ओळखून आपल्या गुणांना वाव दिला पाहिजे. प्रत्येक महिलेने आर्थिकरित्या सक्षम होणं गरजेचं आहे. स्त्री पुरुष समानतेच्या जगात वावरताना कोणाच्या पुढेही जायचं नाही आणि मागेही राहायचं नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आज आहे महाशिवरात्री; अशी करा पूजा

Next Post

या दोन दिवशी होणार डाक अदालत; असा घेता येणार लाभ

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

नाशिक रोड रेल्वे स्थानकातील होल्डिंग एरियाच्या कामांना मंजुरी…गर्दी व्यवस्थापनात होणार फायदा

सप्टेंबर 14, 2025
Screenshot 20250914 163749 Collage Maker GridArt
इतर

मविप्रच्या वार्षिक सभेत खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा (बघा व्हिडिओ)

सप्टेंबर 14, 2025
i4tUkRbQ 400x400
मुख्य बातमी

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
स्थानिक बातम्या

सत्ताधारी पायदळी तुडवतात तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

सप्टेंबर 14, 2025
cbi
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये सीबीआयने दोन बेकायदेशीर कॉल सेंटर केले उदध्वस्त…दोन जणांना अटक

सप्टेंबर 14, 2025
Jayant Patil e1701442690969
संमिश्र वार्ता

भारत आणि पाकिस्तानमध्ये होणा-या सामन्यावर जयंत पाटील यांनी दिली ही प्रतिक्रिया….

सप्टेंबर 14, 2025
GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

आशिया कप स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तानमध्ये होणारा हायव्होल्टेज सामना रद्द होणार? पडद्यामागे हालचाली सुरु

सप्टेंबर 14, 2025
modi 111
राष्ट्रीय

पंतप्रधानाच्या हस्ते मणिपूरमध्ये १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन…

सप्टेंबर 14, 2025
Next Post
post office on rakhi

या दोन दिवशी होणार डाक अदालत; असा घेता येणार लाभ

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011