इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ऑपरेशन सिंदूर आणि सीमापार दहशतवादाविरुद्ध भारताच्या सुरू असलेल्या लढाईच्या संदर्भात, सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे या महिन्याच्या अखेरीस संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांसह प्रमुख भागीदार देशांना भेट देणार आहेत. ही टीम २३-२४ मे दरम्यान ५ ते ८ देशांना जागतिक व्यासपीठावर पाकिस्थानचा पर्दाफाश करणार आहे.
सर्वपक्षीय शिष्टमंडळे भारताची राष्ट्रीय सहमती आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी मजबूत दृष्टिकोन प्रदर्शित करणार आहे. देशाचा दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुतेचा मजबूत संदेश जगासमोर ही टीम घेऊन जातील. प्रत्येक शिष्टमंडळात विविध पक्षांचे संसद सदस्य, प्रमुख राजकीय व्यक्ती असणार आहे.
खालील संसद सदस्य सात शिष्टमंडळांचे नेतृत्व करतील:
१) श्री शशी थरूर, काँग्रेस
२) श्री रविशंकर प्रसाद, भाजपा
३) श्री. संजय कुमार झा, जेडीयू
४) श्री बैजयंत पांडा, भाजप
5) श्रीमती कनिमोळी करुणानिधी, द्रमुक
६) श्रीमती सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस
7) श्रीकांत एकनाथ शिंदे, शिवसेना