इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं बोलावलेली सर्वपक्षीय बैठक नवी दिल्लीत संसद भवन संकुलात संपन्न झाली. बैठकीच्या सुरुवातीला २ मिनिटे मौन पाळून मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठीकाला गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, द्रमुकचे तिरुची शिवा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, समाजवादी पार्टीचे राम गोपाल यादव, आम आदमी पक्षाचे संजय सिंह, राष्ट्रीय जनता दलाचे प्रेमचंद गुप्ता, वायएसआर काँग्रेसचे पी. व्ही. मिधुन रेड्डी, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय इत्यादी नेते या बैठकीला उपस्थित होते.
श्रीनगरमध्येही सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत या हल्ल्याचा एकमुखी निषेध करण्यात आला आणि हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सरकार करत असलेल्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देण्याचा ठराव एकमतानं मंजूर झाला.
दिल्लीत झालेल्या बैठकीबाबत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. राष्ट्रीय एकात्मता आणि दहशतवादाविरोधातील झिरो टॅालरन्स पॅालिसी संदर्भातील सरकारची भूमिका सर्वपक्षीय बैठकीत मांडण्यात आली. सरकारच्या वतीने संरक्षणमंत्र्यांनी पहलगाम दहशतवादी हल्यानंतर भारत सरकाने काय पावलं उचलली याबाबतची माहिती दिली. सर्व राजकीय पक्षांनी सरकारसोबत आहेत असे सांगितले. दहशतविरोधाताली लढाईत सर्व राजकीय पक्ष सोबत आहेत. सरकार जे पावलं उचलेल त्यांच्या सोबत असेल अस राजकीय पक्षांनी सांगितल्याचं किरेन रिजिजू म्हणाले.