गुरूवार, नोव्हेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारतातील वायू प्रदूषणाचा रिपोर्ट आला; अशी आहे गंभीर स्थिती

सप्टेंबर 3, 2021 | 10:51 am
in संमिश्र वार्ता
0
pollution

 

नवी दिल्ली – वायू प्रदूषणामुळे आजार वाढत असून, आपले वयही घटवत आहे. वायू गुणवत्तेच्या (एक्यूएलआय) नव्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, जर भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ या देशांनी वायू गुणवत्तेच्या निकषानुसार हवा स्वच्छ केल्यास आपले आयुष्य ५.६ वर्ष वाढणार आहे. नाही तर तितकेच आयुष्य कमी होईल. सर्वाधिक प्रदूषित दिल्ली आणि कोलकाता या शहरातील लोकांचे आयुष्य नऊ वर्ष कमी होऊ शकते.

एक्यूएलआयतर्फे एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालानुसार, हवा प्रदूषणातून मुक्तता मिळाल्यास जगातील सरासरी आयुष्य दोन वर्ष आणि सर्वाधिक प्रदूषित देशांमधील पाच वर्ष वाढू शकते. भारत आणि शेजारील देशांसाठी हे वय ५.६ वर्ष असेल. भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश या देशांमध्ये जगातील एक चतुर्थांश लोक राहतात. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असेलेल्या पाच देशांमध्ये यांचा समावेश होतो.

भारतातील ४८ कोटी लोक गंगा नदीच्या मैदानी भागात राहतात. तिथे प्रदूषणाचा स्तर खूप जास्त आहे. अहवालानुसार, आता हे प्रदूषण मैदानी भागांच्याही पुढे जाऊन मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये पसरले आहे. या राज्यातील लोकांचे सरासरी आयुष्य २.५ ते २.९ वर्ष गमावू शकतात. केंद्र सरकारतर्फे सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचे (एनकॅप) लक्ष्य पूर्ण झाल्यास राष्ट्रीय आयुर्मान वाढून १.७ वर्षापर्यंत वाढण्यास मदत होणार आहे.

उत्तर भारत जगातील सर्वाधिक प्रदूषित
एक्यूएलआयचा अहवाल सांगतो, उत्तर भारतात प्रदूषणाच्या परिणामाची तीव्रता अंदाजापेक्षा अधिक आहे. उत्तर भारतात हवा प्रदूषणाचा स्तर सर्वात जास्त धोकादायक आहे. २०१९ सारखे प्रदूषण कायम राहिले तर या क्षेत्रात म्हणजे दिल्ली, मुंबई आणि कोलकातासारख्या महानगरातील लोकांचे आयुष्य नऊ वर्षांपेक्षा कमी होणार आहे.

प्रदूषणाचे भौगोलिक कक्षा वाढली
देशात वायूप्रदूषणाचा उच्चस्तराची भौगोलिक कक्षा रूंदावली आहे. गेल्या काही दशकांच्या तुलनेत पार्टिक्युलेट मॅटरची समस्या फक्त गंगेच्या मैदानी भागात राहिलेली नाही. महाराष्ट्र, मध्य प्रदेशसारख्या राज्यांमध्ये प्रदूषणाचा स्तर खूप जास्त वाढला आहे. दोन्ही राज्यात २००० वर्षाच्या सुरुवातीच्या तुलनेत प्रत्येक व्यक्तीचे आयुष्यात २.५ ते २.९ वर्ष अतिरिक्त घट होत आहे.

सरकारे गंभीर
एक्यूएलआयचे संचालक केन ली सांगतात, वायू प्रदूषणाचा सर्वात जास्त परिणाम दक्षिण आशियामध्ये झाला आहे. या भागातील सरकारे समस्येची गंभीरता लक्षात घेऊन उपाययोजना करत आहेत. स्वच्छ हवा आणि दीर्घ आयुष्य सुनिश्चित करण्याच्या दिशेने भारताचा एनकॅप आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हवेची गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाची स्थापना करण्यासारखे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

प्रवीण कुमारची ‘उंच उडी’, भारताच्या खात्यात आणखी एक रौप्यपदक

Next Post

नाशिक – जिल्ह्यात महानगरपालिका क्षेत्रात ५०२ कोरोना रुग्ण; पंधरा तालुक्यात ५४२ तर जिल्हाबाह्य १९ रुग्ण

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
carona 1

नाशिक - जिल्ह्यात महानगरपालिका क्षेत्रात ५०२ कोरोना रुग्ण; पंधरा तालुक्यात ५४२ तर जिल्हाबाह्य १९ रुग्ण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011