मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चक्क मंगलअष्टकांशिवाय झाले लग्न… मग, कोणते गाणे म्हटले? अहमदनगरच्या विवाहाची सर्वत्र जोरदार चर्चा

by India Darpan
जून 30, 2023 | 5:06 am
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणत्याही लग्न सोहळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे मंगलाष्टके होय, कारण हळद समारंभ, मेहंदी, वरात जेवणावळी, मानपान यापेक्षा सर्वात जास्त महत्त्वाचे स्थान मंगलाष्टकांना असते, तरच लग्न समारंभ खऱ्या अर्थाने संपन्न झाला असले समजले जाते. हिंदू धर्मात किंवा भारतीय संस्कृतीत याला महत्त्वाचे स्थान आहे. परंतु अहमदनगर शहरात मंगलाष्टकाशिवाय एक लग्न समारंभ पार पडला, त्यामुळे ‘सावधान… ‘ वगैरे चा निनाथ आवाज तिथे घुमलाच नाही, मात्र त्याऐवजी छत्रपती शिवरायांचे पोवाडे सर्वांना ऐकू येत होते, नेमके काय घडले येथे…

खर्चाला फाटा…
आपले लग्न हे आठवणीत राहावे म्हणून अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे लग्न सोहळा करत असतात. कुणी हवेत लग्न करतो तर कुणी पाण्यात लग्न करतो. अहमदनगरच्या थोरात आणि धिसले परिवारातील योगिनी आणि विकास यांच्या विवाहसोहळ्यात मंगलअष्टका म्हटली गेली नाहीत. मात्र या दोन्ही परिवाराने हा विवाह सोहळा हटक्या पद्धतीने पार पाडला. केवळ आठवणीत राहण्यासाठी नाही तर या विवाह सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे असलेले आपल्या जीवनातील अनन्य साधारण महत्व आलेल्या वऱ्हाडी मंडळींपर्यंत पोहचावे हा त्यांचा हेतू होता. यासाठी त्यांनी मंगल अष्टकाऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करत लग्न सोहळा पार पाडला. विशेष म्हणजे आलेल्या पाहुण्यांचा सत्कारावर होणाऱ्या खर्चाला फाटा देत त्यांनी तो खर्च शिक्षण संस्था आणि विविध मंदिरांना दान म्हणून दिला.

उच्चशिक्षीत कुटुंब
गोरक्षनाथ थोरात हे रयत बँकेमध्ये शाखाधिकारी म्हणून निवृत्त झालेले असून त्यांची पत्नी शैला थोरात या धार्मिक वृत्तीच्या गृहीणी आहेत. आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली. त्यांची एक मुलगी शिक्षिका आहे तर मुलगा अभिषेक थोरात हा इंजिनियर झाल्यानंतर एका अमेरिकन कंपनीत नोकरीला लागला. तर दुसरी मुली योगीनी थोरात ही एमसीएसची पदवी घेऊन पुण्यात एका कंपनीत नोकरी करते. तसेच करमाळा येथील नवरा मुलगा विकास किसन धिसले हा बीटेक आणि एमबीए पदवी घेऊन उच्चपदस्थ कंपनीत पुणे येथे जॉब करत आहे.

शिवाजी महाराजांचे निस्सिम भक्त
दोन्ही कुटुंबं उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी या महाराष्ट्राला प्रेरणा दिली, छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरात कुटुंब हे निस्सीम भक्त आहेत. त्यामुळे हे लग्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने आणि स्फूर्तीने व्हावे, अशी दोन्ही कुटुंबियांची इच्छा होती. त्यानुसार हा अनोखा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या अनोख्या विवाह सोहळ्याची शहरासह जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच या दोन्ही परिवाराचा आदर्श इतरांनी घ्यावा असे म्हटले जात आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

पिंपरी-चिंचवडकरांनो, इकडे लक्ष द्या! तुमच्या पैशाची उधळपट्टी होतेय

India Darpan

Next Post
PCMC

पिंपरी-चिंचवडकरांनो, इकडे लक्ष द्या! तुमच्या पैशाची उधळपट्टी होतेय

ताज्या बातम्या

Untitled 79

राज्यातील या जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट; कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

जून 24, 2025
indian army e1750762947859

संरक्षण मंत्रालयाने दहशतवादविरोधी क्षमता वाढविण्यासाठी २ हजार कोटी रुपयांचे आपत्कालीन खरेदी करार केले पूर्ण

जून 24, 2025
crime 88

धाडसी घरफोडीत चोरट्यांनी पावणे नऊ लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला…अशोका मार्ग भागातील घटना

जून 24, 2025
fir111

बाली येथील सहलीचे आमिष दाखवत पैसे गोळा करून यात्रा कंपनीने ग्राहकांना घातला गंडा

जून 24, 2025
mantralya mudra

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण आठ निर्णय….

जून 24, 2025
CM

महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011