मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अहमदनगर जिल्ह्यात अशी आहे पाण्याची स्थिती.. टंचाईचा प्रश्न गंभीर… पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

by Gautam Sancheti
ऑगस्ट 28, 2023 | 9:03 pm
in राज्य
0
IMG 20230828 WA0010

अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गत वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. या परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापराबरोबरच उपलब्ध संसाधनांचा प्रभावीपणे वापर करावा. जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशीलपणे काम करण्याचे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी पालकमंत्री श्री विखे पाटील बोलत होते. यावेळी आमदार बबनराव पाचपुते,आमदार प्रा.राम शिंदे, आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, आमदार डॉ.किरण लोहमटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी उपस्थित होते.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचे पिण्यासाठी व सिंचनासाठीच्या वापराचे काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे.पाण्याचा अपव्यय होणार नाही यादृष्टीने काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. पाऊस कमी झाला असल्यामुळे गावातून टँकरद्वारे पाणी पुरवठयाच्या मागण्या प्राप्त होतील. ज्या ज्या गावातून टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी येईल अश्या ठिकाणी टँकर मंजूर करत पाणी पुरवठ्याला प्राधान्य देण्यात यावे. गावामध्ये पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक ठरविण्यात यावे. प्रत्येक टँकरवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. पाणी पुरवठ्यामध्ये नागरिकांची तक्रार येणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी दिले.

जनावरांना पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला चार विकत घेण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे अशा शेतकऱ्यांना चारा बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यांनी उत्पादीत केलेला चारा शासन खरेदी करणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना चारा उत्पादनासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. तसेच तातडीने किती चारा उपलब्ध होऊ शकतो याची माहिती घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी दिल्या. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधीनी टंचाई परिस्थितीबाबत उपयुक्त अशा सूचना मांडल्या. बैठकीस सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

के.के. रेंज व अहमदनगर-मनमाड हायवेच्या कामाचा आढावा
के.के. रेंज व अहमदनगर- मनमाड राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
के के रेंजसाठीचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावरून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील. यासंदर्भात संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांशी आपण वैयक्तिक चर्चा करत आहोत. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे लवकरच लोणी येथे येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून केके रेंजेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. आरक्षित जमीनीबाबत शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच अहमदनगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने व विहित वेळेत पुर्ण करण्यात यावे. हे काम करत असताना कामाचा दर्जा व गुणवत्ता उच्च दर्जाची राहील याची काळजी घेण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.

Ahmednagar District Water Scarcity Guardian Minister
Review Meet Rainfall Dam Storage Animal Fodder Crop Agriculture

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अंबानी कुटुंबातील नवीन पिढीकडे रिलायन्सची कमान… नीता अंबानींचा राजीनामा…

Next Post

नांदगाव तालुक्यातील भालूर विद्यालयाची खो-खो स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड..

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20230828 WA0311

नांदगाव तालुक्यातील भालूर विद्यालयाची खो-खो स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड..

ताज्या बातम्या

crime1

रिक्षातून शेतातील साहित्य चोरून नेणा-या दोघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

जुलै 8, 2025
mahavitarn

महावितरणच्या २३ पैकी ६ कर्मचारी संघटनांचा उद्या एक दिवसाचा संप…

जुलै 8, 2025
band

उद्या भारत बंद…देशातील २५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार…या सेवांवर होणार परिणाम

जुलै 8, 2025
Untitled 23

मंत्री प्रताप सरनाईकांना मोर्चात विरोध, ५ मिनिटांत निघावं लागलं…त्यानंतर दिले हे स्पष्टीकरण

जुलै 8, 2025
फिजीक्सवाला एमओयु 1

मुक्त विद्यापीठाचा ऑनलाईन शिक्षणक्रमांसाठी फिजिक्सवाला सोबत सामंजस्य करार

जुलै 8, 2025
1001970699

‘विकसित महाराष्ट्र- २०४७’ सर्वेक्षण…असे होता येईल सहभागी

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011