मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरुन लंडनला निघालेलं एअर इंडियाचं विमान अहमदाबाद शहरातील इमारतींवर कोसळून झालेल्या अपघातात २४२ प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर असल्याची माहिती आहे. या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही प्रवास करत होते.
या विमानात २४२ पैकी १६९ भारतीय, ५३ ब्रिटीश नागरिक, पोर्तुगालचे ७, कॅनडाचा एक नागरिक प्रवास करत होते. या दुर्घटनेत सर्व प्रवासी मृत्युमुख पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातात स्थानिक नागरिकांचा झालेला मृत्यू झाला आहे.
अहमदाबादहून लंडनला जाणारं एअरइंडियाचं विमान उड्डाणानंतर थोड्याच वेळेत अहमदाबाद शहरातील इमारतींवर कोसळलं. गुजरात पोलिस, अग्निशमन, अॅम्ब्युलन्स सेवा, वैद्यकीय पथकांनी, सुरक्षादलांनी दुर्घटनास्थळी पोहचून तातडीने बचाव व मदतकार्य तातडीने राबवलं. परंतु झालेली जिवितहानी खुप मोठी आहे. अपघाताचं निश्चित कारण अद्याप कळलं नसलं तरी चौकशीअंती ते स्पष्ट होईल. परंतु अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनींही विमान दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडून अपघाताची संपूर्ण माहिती घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना गुजरातला पाठवले. या दुर्घटनेच्या निमित्तानं विमानसेवेच्या सुरक्षिततेकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. विमानसेवा कंपन्यांनी त्यांच्या विमानसेवेच्या सुरक्षेचा फेरआढावा घेऊन, सुरक्षितता मानकांचे पालन करुन भविष्यात अशी दुर्घटना होणार नाही, हे सुनिश्चित करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.