अहिल्यानगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अकोले तालुक्यातील राजुर येथे कावीळ रोगाची साथ सुरु असून पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी सुरक्षिततेच्यादृष्टीने ३ ते ६ मे २०२५ या कालावधीत राजुर येथे आयोजित करण्यात आलेली पीर चाँद शाहवली उरुस यात्रा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी साथरोग अधिनियम १८९७ चे कलम २ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ४३ नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करत स्थगित करून अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.