सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘शेतकऱ्यांचं भलं असेल तर घेणार हा मोठा निर्णय’, कृषी मंत्री सत्तारांचे संकेत… असं काय आहे?

by Gautam Sancheti
एप्रिल 30, 2023 | 5:39 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
abdul sattar e1658747385510

 

छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बरेचदा इतर राज्यांमधील सरकारचे चांगले निर्णय आपल्या राज्यात लागू करण्यात आल्याचे आपण बघतो. दिल्ली सरकारने मोहोल्ला क्लिनिक सुरू केल्यानंतर काही राज्यांनी ही संकल्पना राबविण्याचा प्रयत्न केला. तसेच आता तेलंगण सरकारने घेतलेला तलाठी रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारमधील एका मंत्र्याला आवडलेला आहे आणि शेतकऱ्यांचे भले होणार असेल तर विचार करायला हरकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

तेलंगण राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी अलीकडेच तलाठी पद रद्द करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर शेजारच्या राज्यांचे विशेष लक्ष वेधले गेले. त्यातही महाराष्ट्रात यासंदर्भात जास्त चर्चा होऊ लागली. कारण महाराष्ट्रात तलाठी पदाला वेगळे महत्त्व आहे व अनेक सरकारी कामे या पदाच्या मार्फत होत असतात. त्यामुळे पत्रकारांशी संवाद साधताना कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी देखील यासंदर्भात मोठे विधान केले आहे.

तेलंगणा सरकारने तलाठी पद रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने तेथील शेतकऱ्यांना फायदा होत असेल तर असा निर्णय घेण्याच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारही विचार करू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे लक्षात आले तर याबाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी बोलेन, असे ते म्हणाले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.आर. राव यांच्या बीआरएस पक्षाची गेल्या आठवड्यात शहरात सभा झाली. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी तेलंगणा राज्यात तलाठी हे पद रद्द करण्यात आल्याचे सांगितले. याच सभेचा संदर्भ देत, पत्रकारांनी राज्यात तेलंगणासारखे तलाठी पद रद्द करणार का, असा सवाल केला. या प्रश्नाचे उत्तर देताना कृषीमंत्र्यांनी गरज भासल्यास संबंधित मंत्र्यांशी बोलणार असल्याचे सांगितले.

तलाठ्याची गरजच नाही
यापूर्वी ग्रामविकास, महसूल आणि कृषी विभाग यांच्यात समन्वय होता. मात्र आता महसूल विभागाकडे केवायसीच्या माध्यमातून अचूक माहिती मिळते. त्यामुळे तलाठ्याची गरजच उरली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक थांबणार असेल तर महसूलमंत्र्यांना तलाठी पद रद्द करण्याची नक्कीच विनंती करेन. कारण ते खाते माझ्याकडे नाही. माझ्या खात्याच्या बाबतीत काही असते तर मी नक्की बोललो असतो, असेही अब्दूल सत्तार म्हणाले.

Agriculture Minister Abdul Sattar on Big Decision

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वडाळानाका भागात बस चालकास मारहाण; दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल

Next Post

निसर्ग कोपला… बळीराजा संपला… महिनाभरात ९ वेळा गारपीट व अवकाळीचे थैमान.. हजारो रुपये खर्चूनही कांद्याला जमिनीतच गाडण्याची वेळ..

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 14, 2025
Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री…नाफेडने दिले हे स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2025
rain1
संमिश्र वार्ता

नाशिकसह या जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

सप्टेंबर 14, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

नाशिक रोड रेल्वे स्थानकातील होल्डिंग एरियाच्या कामांना मंजुरी…गर्दी व्यवस्थापनात होणार फायदा

सप्टेंबर 14, 2025
Screenshot 20250914 163749 Collage Maker GridArt
इतर

मविप्रच्या वार्षिक सभेत खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा (बघा व्हिडिओ)

सप्टेंबर 14, 2025
i4tUkRbQ 400x400
मुख्य बातमी

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
स्थानिक बातम्या

सत्ताधारी पायदळी तुडवतात तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

सप्टेंबर 14, 2025
Next Post
IMG 20230430 WA0026

निसर्ग कोपला... बळीराजा संपला... महिनाभरात ९ वेळा गारपीट व अवकाळीचे थैमान.. हजारो रुपये खर्चूनही कांद्याला जमिनीतच गाडण्याची वेळ..

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011