सोमवार, नोव्हेंबर 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शेतीचे नुकसान ४० हजार… भरपाई मिळाली १ हजार… शेतकऱ्याने केली ही गांधीगिरी

नोव्हेंबर 5, 2022 | 12:23 pm
in संमिश्र वार्ता
0
Flood Crop Loss

भंडारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अतिवृष्टीमुळे यंदा शेतीचे आतोनात नुकसान झाले. या नुकसानीपोटी राज्य सरकारने भरपाई जाहीर केली आणि आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरपाईची रक्कम जमा केली जात आहे. जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला मिळालेली नुकसान भरपाई अक्षरशः त्याची चेष्टा करणारीच ठरली आहे. त्यामुळेच या शेतकऱ्यानेही गांधीगिरी करीत आपला निषेध व्यक्त केला आहे.

राज्यात यंदा प्रमाणेच मागील वर्षी अवकाळी व अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीची हानी सर्वाधिक पाहायला मिळाली. यामुळे राज्यातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन वर्षात शेतकरी बांधवांच्या हातून रब्बी खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे. यंदाही जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विदर्भात अनेक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता मागील वर्षाची अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या बदल्यात नुकसान भरपाई देण्यास सुरुवात झाली आहे. गतवर्षी रब्बी हंगामात झालेल्या गारपिटीची तब्बल वर्षभराने नुकसान भरपाई मिळाली. एका शेतकऱ्याचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असताना प्रत्यक्षात मदतीपोटी केवळ १ हजार रुपये बँक खात्यात जमा झाले. सदर तुटपुंजी मदत पाहून शेतकऱ्याचा तीव्र संताप झाला त्यामुळे त्यांनीही मदत त्यामुळे त्याने ही शासनाकडून आलेली मदत पुन्हा शासनाला परत केली आहे. अशा प्रकारे आम्हाला भीक नको असे देखील शेतकऱ्यांकडून म्हटले जात आहे.

भंडारा लाखांदूर तालुक्यातील किरमटी येथील रहिवासी जयपाल प्रकाश भांडारकर , त्याने एक हजार रुपये लाखांदूर तहसील कार्यालयाच्या बँक खात्यात जमा करून शासनाला परत केले. भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आदि जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी बांधवांना शासनाकडून नुकसान भरपाई अनुदान स्वरूपात देण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळेल, असे वाटत असताना अत्यंत तुटपुंजी किंवा तोकड्या पद्धतीने नुकसान भरपाई वाटत येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी तथा संताप व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित ज्या शेतकरी बांधवांना अद्याप अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळालेली नाही अशा शेतकरी बांधवांना लवकरच नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे. विदर्भात २०२१ व २०२२ मध्ये झालेल्या गारपीट, अवकाळीच्या नुकसानीचे कोट्यावधीचे अनुदान विभागाला वितरित करण्यात आले आहे. बाधित नागरिकांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या वर्षी अतिवृष्टी व गारपीट यामुळे रब्बी हंगामात तालुक्यात शेकडो शेतकऱ्यांसह जयपाल यांच्याही शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने गारपीटग्रस्तांना मदत घोषित केली. महसूल व कृषी विभागाने सर्वेक्षण करून अहवाल सादर केला. यादीत जयपाल यांचेही नाव असून बँक खात्यात केवळ एक हजार रुपये. जमा झाले. मात्र ही तुटपुंजी रक्कम पाहून भांडारकर संतप्त झाले. त्यानंतर त्यांनी तडक लाखांदूर तहसील कार्यालय गाठून शासनाच्या बँक खात्यात १ हजार रुपये जमा केले. तसेच लाखांदूर तहसीलदार वैभव पवार यांची भेट घेऊन त्यांना तसे निवेदनही दिले.

शेतकऱ्यांना ही भरपाई जाहीर करताना जुन्या जीआर विचारात घेतला आहे. नवा जीआर विचारात घेतला असता तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असता. आता ही रक्कम म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टाच म्हणावी लागेल. कुठेतरी वास्तववादी निकषांचा भरपाई देताना विचार व्हायला हवा, असे मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

Agriculture Farm Crop Loss Compensation Farmer Gandhigiri

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

Next Post

आता आदित्य ठाकरेंच्या मेळाव्याला परवानगी नाकारली, एकनाथ शिंदेंच्या पुत्राला मात्र दिली

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
aditya thackeray 2 e1658480643618

आता आदित्य ठाकरेंच्या मेळाव्याला परवानगी नाकारली, एकनाथ शिंदेंच्या पुत्राला मात्र दिली

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011