शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भाजप आणि शिवसेना युती पुन्हा होणार? नेमकं कुठं अडलंय घोडं?

by Gautam Sancheti
जुलै 14, 2022 | 11:23 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी झाल्यानंतर भाजपच्या मदतीने बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. भाजपसोबत जुळवून घ्यावे, अशी मागणी बंडखोर नेत्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. शिवसेनेतील उभी फूट रोखण्यासाठी उद्धव यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. परंतु आता बंडखोरांशिवाय पक्षातील आमदार, खासदार आणि अन्य पदाधिकारीही भाजपशी युती करण्याबाबत आग्रही आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेने राष्ट्रपती पद निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रोपदी मूर्मू यांना पाठिंबा दिला आहे. युतीच्या दिशेने हे पहिले पाऊल असल्याचे सांगितले जात आहे. आता पुन्हा भाजप-सेना युती जुळणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यासंदर्भात घोडे नेमके कुठे अडले आहे हे बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर उपस्थित राहिले होते, यावेळी त्यांनी शिवसेना-भाजप युतीच्या संदर्भात वक्तव्य केल्याने या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्या या निर्णयाचे भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागतच आहे.

राष्ट्रपती निवडणुकीबाबत एनडीएची महत्वाची बैठक राजधानी दिल्लीत पार पडली. या बैठकीला शिंदे गटाकडून दीपक केसरकरांनी हजेरी लावली होती. या बैठकीनंतर मुंबईत दाखल झालेल्या केसरकरांनी दावा केला आहे की, भाजप शिवसेना युतीचे मानापमान नाट्य सुरू आहे. कुणी पुढाकार घ्यायचा यावर सगळे अडले आहे. केसरकर यांच्या दाव्याने पुन्हा भाजप-शिवसेना युती होणार का? उद्धव ठाकरे सर्वकाही सोडून भाजपसोबत जाणार का? अशी चर्चा सुरु आहे.

पहिला फोन कुणी करायचा यावरूनच युती खोळंबली आहे, असे केसरकर म्हणाले. त्यामुळे अडीच वर्षापूर्वी मुख्यमंत्रीपदावरुन फिस्कटलेली शिवसेना आणि भाजपची युती एका फोनने पुन्हा होऊ शकते, अशी शक्यता आहे. केसरकर म्हणाले की, हा वाद आमच्यामध्ये नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतचे नाते तोडा, आम्ही ५० जण माघारी येतो असे सांगितले, पण त्यांनी आघाडी तोडली नाही. आता मात्र काही कारणाने आघाडी तुटली आहे. त्यावेळी तरी तुम्ही हा निर्णय घ्या. भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम्हाला एकट्याला निर्णय घेता येणार नाही. त्यावेळी तुम्हाला भाजपचाही विचार करावा लागेल, असेही केसरकर उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता म्हणाले.

केसरकर आणखी पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंना लहान भाऊ मानले आहे. मोदींनी 370 हटवून बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण केले असून राम मंदिर हे बाळासाहेबांचं स्वप्न होते आणि मोदींनी तेही पूर्ण केले आहे. आता फक्त फोन कुणी करायचा? यावर अडले आहे. तसेच केसरकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केलीय. शरद पवार यांनी चार वेळा शिवसेना फोडली. उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडी नाईलाजास्तव करावी लागली होती, असेही केसरकर यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन केसरकरांवर निशाणा साधलाय. ‘अहो केसरकर किती बोलता पवार साहबां विरुद्ध एके काळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले. जिथे आहात तिथे सुखी राहा, असा सूचक इशाराच आव्हाड यांनी केसरकरांना दिला आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की, आता शिवसेना-भाजप युती आहेच. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार अजूनही शिवसेनेचेच आहेत. आम्ही तर शिंदे यांना रोजच फोन करतो. भाजपने याआधी युती केलीच होती. त्यामुळे पवारसाहेब त्यांच्या सोबत असताना आमच्याकडून फोन जाण्याचा प्रश्नच नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले.

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, कोण फोन करणार याबाबत मी सांगू शकत नाही. मात्र माझ्या पक्षाच्या प्रमुखांचा जो निर्णय असेल तो मान्य असेल. आम्ही त्यांच्या निर्णयासोबत असू. युती तुटल्यानंतर त्यांचे पहाटे सत्तांतर घडले, रात्रीचे छुप्या पद्धतीने भेटणे या गोष्टी सर्वांनी पाहिलं आहे. मतदारांना तुम्ही येडे समजता का? असा सवाल देखील पेडणेकर यांनी भाजपला केला.

Again Shivsena and Bjp Alliance initiative which is barrier

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुलाचे काम पूर्ण न झाल्याने नागरिकांना सहन करावा लागतोय त्रास (व्हिडीओ)

Next Post

नाशिक जिल्हयातील धरणात ७३ टक्के साठा; पाच धरणे ओव्हरप्लो

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, शनिवार, १३ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 12, 2025
sushila kargi
मुख्य बातमी

अखेर नेपाळच्या पंतप्रधानपदी पहिल्या मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की …अंतरिम सरकार स्थापन

सप्टेंबर 12, 2025
road 1
संमिश्र वार्ता

येवला तालुक्यातील या जिल्हा मार्ग रस्त्यांची राज्य मार्गात दर्जोन्नती…

सप्टेंबर 12, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

अतिवृष्टीमुळे नुकसानीपोटी बाधितांना ७३ कोटी ९१ लाखाची मदत….या जिल्ह्यातील शेतक-यांना मिळणार लाभ

सप्टेंबर 12, 2025
IMG 20250912 WA0319 scaled e1757675834888
स्थानिक बातम्या

नाशिकच्या जलतरणपटूंनी कॅटालिना चॅनल रिले मोहीम यशस्वी करून रचला इतिहास…

सप्टेंबर 12, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये विद्युत उपकेंद्रातील रोहित्र क्षमतावाढीचे काम सुरु…शनिवारी या भागातील वीजपुरवठा राहणार बंद

सप्टेंबर 12, 2025
jilha parishad
संमिश्र वार्ता

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर…नाशिकचे आरक्षण या गटासाठी आरक्षित

सप्टेंबर 12, 2025
crime 13
क्राईम डायरी

इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू….लहवित येथील घटना

सप्टेंबर 12, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशिक जिल्हयातील धरणात ७३ टक्के साठा; पाच धरणे ओव्हरप्लो

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011