इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एकीकडे एकनाथ शिंदे गटाने आनंद व्यक्त केला आहे तर दुसरीकडे भाजपही सक्रिय झाला आहे. निकालानंतर शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय झाल्याचे ट्विट केले आहे. त्याचवेळी भाजप नेते हे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
शिंदे गटाच्या आमदारांना मोठा दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने १२ जुलैपर्यंत अपात्रतेपासून दिलासा दिला आहे. तसेच, न्यायालयाने फ्लोर टेस्टला स्थगिती दिलेली नाही. अशा स्थितीत राज्यपालांची भेट घेऊन भाजप फ्लोअर टेस्टची मागणी करू शकते, असे मानले जात आहे. दुसरीकडे शिंदे गटही लवकरच गुवाहाटी सोडून मुंबईत येऊ शकते.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतचे संख्याबळ सातत्याने कमी होत आहे. बहुतांश मंत्री हे शिंदे गटात सामील झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपदांच्या कामांची फेरवाटप केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात ४० हून अधिक आमदार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. अशा परिस्थितीत बहुमत सिद्ध करण्यासाठी १४४ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. सध्याच्या सरकारमध्ये शिवसेनेचे ५५, राष्ट्रवादीचे ५३ आणि काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. याशिवाय अपक्ष आमदारांचाही पाठिंबा महाविकास आघाडी सरकारला मिळाला होता.
भाजपने राज्यपालांकडे फ्लोअर टेस्टची मागणी केली आणि परवानगी घेतली, तर पक्ष सध्या मजबूत स्थितीत आहे. भाजपकडे सध्या १०६ आमदार आहेत. अशा परिस्थितीत हा पक्ष आजही प्रमुख विरोधी पक्ष आहे. शिंदे गटाने भाजपशी हातमिळवणी केली तर ते विधानसभेत सहज बहुमत सिद्ध करून सरकार स्थापन करेल, अशी चिन्हे आहेत.
after supreme court order bjp and shinde group strategy Maharashtra Political Crisis