नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जम्मू-काश्मीरपाठोपाठ आता राजस्थानमधील नागौर येथे लिथियमचा भरमसाठ साठा सापडला आहे. लिथियनला पांढरे सोने म्हणूनही संबोधले जाते. या साठा सापडल्याने चीनवरील लिथियमसंदर्भातील भारताचे परावलंबित्व कमी होणार आहे. तसेच भारत साकारू पाहत असलेल्या हरित अर्थव्यवस्थेसाठी लिथियम गेमचेंजर ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
भारत सध्या चीनसह दहा देशांतून लिथियमची आयात करतो. २०१८ मध्ये भारताने ११ हजार ७०० कोटींहून अधिक मूल्याचे लिथियम आयात केले. २०१४ च्या तुलनेत सध्या भारताकडून होणाया लिथियम आयातीचे प्रमाण ४०० टक्क्यांवर गेले आहे. या पार्श्वभूमीवर मिळालेला हा साठा भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. लिथियम हा जगातील सर्वात हलका धातू आहे. तो चाकूने कापता येतो. पाण्यावर चक्क तरंगतो.
हा धातू रासायनिक ऊर्जा साठवून तिचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करतो. लिथियम हा बॅटरीत वापरला जाणारा सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहे. घड्याळे, रिस्ट वॉच, लॅपटॉप, मोबाइल फोन अशा सर्वातच हा धातू वापरला जातो. पांढरे सोने म्हणून याची ओळख आहे. जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आणि खाण अधिकायांनी असा दावा केला आहे की, हा साठा भारताच्या एकूण लिथियमच्या मागणीपैकी ८० टक्के पूर्तता करणार आहे. या साठ्याच्या शोधामुळे लिथियमसाठी चीनवरील भारताचे अवलंबित्व कमी होण्यास मदत होऊ शकते.
मक्तेदारी संपुष्टात येणार
लिथियमच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी भारत आतापर्यंत चीनवर अवलंबून आहे. मात्र, राजस्थानमध्ये नवीन साठा सापडल्याने चीनची लिथियमचा पुरवठादार म्हणून असलेली मक्तेदारी संपुष्टात येईल आणि आखाती देशांप्रमाणे राजस्थान आर्थिकदृष्ट्या संपन्ना होईल, असे आयएएनएसने वृत्तात म्हटले आहे.
भारतासाठी आशादायी चित्र
लिथियम हा एक नॉन-फेरस धातू आहे, ज्याचा वापर मोबाइल, लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहन आणि इतर चार्ज करण्यायोग्य बॅटरी बनवण्यासाठी केला जातो. लिथियमसाठी भारत पूर्णपणे परदेशी पुरवठ्यावर अवलंबून आहे आणि लिथियम महाग असल्याने त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात. आता जीएसआयला देगाना परिसरात लिथियमचे मोठे साठे सापडले आहेत. त्याचा फायदा भारताला होणार आहे.
After Jammu Kashmir State Lithium reserve found