रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

…म्हणून झाले होते हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांच्यात ब्रेकअप

by Gautam Sancheti
जानेवारी 3, 2022 | 5:41 am
in मनोरंजन
0
Dhw7wBkU8AA1mlV

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलिवूडमध्ये काम करताना अनेक कलाकारांच्या जोड्या जुळतात आणि ते जन्मभराचे साथीदार देखील बनतात. परंतु काही वेळा या प्रेमामध्ये त्रिकोण निर्माण होतो आणि त्यात विघ्न येते आणि जवळीक होता – होता, दुरावा निर्माण होतो. अशा अनेक घटना आपल्याला या चित्रपट सृष्टीत आढळून येतात.

फिल्म इंडस्ट्री मधील इतिहासात असे प्रेमाचे, दुराव्याचे आणि भांडणाचे देखील अनेक प्रकार घडलेले आहेत. या संदर्भात मागोवा घेतला असता आपल्याला अनेक रंजक गोष्टी माहित होतात. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते संजीव कुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या चित्रपटांनी आणि त्यांच्या शैलीने एक जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या फिल्मी करिअरशिवाय दोघेही त्यांच्या अफेअरमुळे खूप चर्चेत होते.

संजीव कुमार हे हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडल्याने तिच्या घरीही लग्नाची मागणी करण्यासाठी गेले. मात्र एका अभिनेत्यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. ही दुरावा इतकी वाढली होती की, दोघांचे ब्रेकअपही झाले होते. हा अभिनेता दुसरा कोणी नसून बॉलीवूडचा ‘पहिला सुपरस्टार’ राजेश खन्ना होता. वास्तविक हेमा मालिनी आणि संजीव कुमार ‘त्रिशूल’, ‘कुंवरा बाप’ आणि ‘धूप छां’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते. आणि त्यांच्यात प्रेमही निर्माण झाले होते.

संजीव कुमार यांच्या आत्मचरित्रा नुसार असे दिसून येते, राजेश खन्ना यांना माहित होते की, संजीव कुमार आणि हेमा मालिनी यांच्यात प्रेम आणि थोडे मतभेदही आहेत. त्यामुळे त्यामुळे त्यांनी दोघांमध्ये खूप गैरसमज निर्माण केले आणि त्यांचे ब्रेकअपही झाले. त्याचे असे झाले की, स्टर्लिंग सिनेमात हॉलिवूड चित्रपटाचा प्रीमियर शो आयोजित केला होता, जिथे त्यांनी राजेश खन्ना आणि संजीव कुमार या दोघांना बोलावले होते. आयएनटीचे निर्माते बच्चू संपत यांनी राजेश खन्ना यांना शर्मिला टागोरसोबत येण्यास सांगितले होते, तर संजीव कुमार यांनी हेमा मालिनी यांना सोबत येण्यास सांगितले होते.

त्याच वेळी राजेश खन्ना यांना माहित होते की, संजीव कुमार प्रीमियरसाठी येणार आहेत, परंतु संजीव कुमार प्रीमियरला लवकर पोहोचले. काही वेळाने राजेश खन्ना तिथे आले आणि येताना राजेश खन्ना यांनी त्यावेळी हेमा मालिनी यांचा हात धरला होता आणि त्यांच्यासोबत प्रवेश करत आहोत असे भासविले, यामुळे संजीव कुमारला याचा खूप राग आला, तर दुसरीकडे ‘ड्रीम गर्ल’ हेमा देखील या लाडक्या अभिनेत्याला तिथे पाहून आश्चर्यचकित झाली. राजेश आणि हेमा दोघांना एकत्र पाहून संजीव कुमार स्टेजवरून उतरले आणि त्यांच्यापासून दूर प्रेक्षकांमध्ये जाऊन बसले.

शो दरम्यान हेमा मालिनी आणि संजीव कुमार त्यानंतर अनेक दिवस एकमेकांशी बोलतही नव्हते. खुद्द अभिनेता संजीवकुमारच्या मित्रांनीही त्याला या गैरसमजा बद्दल समजावण्याचा प्रयत्न केला की राजेश खन्ना यांनी त्या गोष्टी जाणूनबुजून केल्या आहेत आणि यात ‘ड्रीम गर्ल’ हेमाची काही चूक नाही. पण संजीवकुमारला या गोष्टी सहन झाल्या नाहीत. त्यांच्या मनात गैरसमज असल्याने त्यांनी हेमा मालिनी यांचे म्हणणेही ऐकले नाही. आणि अक्षर दोघांचे ब्रेक-अप झाले परंतु हेमामालिनी आणि राजेश खन्ना यांची मैत्री देखील टिकली नाही. यात फायदा झाला तो धर्मेंद्र यांचा म्हणजे दोघांचे भांडण नि तिसऱ्याचा लाभ असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क सांगणाऱ्या मुलाला फटकारले; हायकोर्टाने दिला हा निकाल

Next Post

नाशिक-अहमदाबाद विमानसेवेचे असे आहे वेळापत्रक

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 14, 2025
Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री…नाफेडने दिले हे स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2025
rain1
संमिश्र वार्ता

नाशिकसह या जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

सप्टेंबर 14, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

नाशिक रोड रेल्वे स्थानकातील होल्डिंग एरियाच्या कामांना मंजुरी…गर्दी व्यवस्थापनात होणार फायदा

सप्टेंबर 14, 2025
Screenshot 20250914 163749 Collage Maker GridArt
इतर

मविप्रच्या वार्षिक सभेत खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा (बघा व्हिडिओ)

सप्टेंबर 14, 2025
i4tUkRbQ 400x400
मुख्य बातमी

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
स्थानिक बातम्या

सत्ताधारी पायदळी तुडवतात तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

सप्टेंबर 14, 2025
Next Post
Nashik Airport

नाशिक-अहमदाबाद विमानसेवेचे असे आहे वेळापत्रक

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011