मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – काही वर्षापूर्वी वादग्रस्त ठरलेला बॉलीवूड अभिनेता संजय दत्त सध्या त्याच्या KGF Chapter 2 या चित्रपटातील चमकदार कामामुळे सध्या पुन्हा चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका साकारली असून आता तो अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ या चित्रपटात दिसणार आहे. अभिनेता संजय दत्त त्याच्या अभिनयामुळे जितका चर्चेत राहतो तितकेच त्याचे वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत असते. संजय दत्तची जुळी मुले शहारान व इकरा 11 वर्षांची आहेत, ती गेल्या 2 वर्षांपासून दुबईत राहत आहेत. नुकतेच संजय दत्तने दुबईत राहण्याचे कारण सांगितले आहे.
एका मुलाखतीत संजय दत्तला मान्यता आणि त्याच्या मुलांचे दुबईत राहण्याचे कारण विचारण्यात आले. या प्रश्नावर संजय म्हणाला की, त्याची मुले आणि मान्यता यांना तिथे राहणे आवडते. त्यांना मुंबईतही राहता आले असते, पण त्यांना दुबईत राहण्यात अधिक आनंद मिळतो. शूटिंगमधून वेळ मिळताच संजय दत्त दुबईला जातो. मान्यता दत्त आणि मुलांना दुबईत राहायला आवडते, तर संजय दत्तला दुबईपेक्षा मुंबई जास्त आवडते पण वेळ मिळताच तो आपल्या मुलांपर्यंत पोहोचतो. संजय दत्तची मुले दुबईतील त्याच शाळेत शिकतात.
संजय दत्तने सांगितले की, त्याच्या पत्नीने दुबईमध्ये तिचा व्यवसाय सुरू केला आहे. त्याच्या पत्नीचा तेथे राहण्याचा कोणताही विचार नव्हता. हे सर्व नुकतेच घडले. मान्यता तिथे स्वतःचा व्यवसाय करत होती, त्यामुळे ती अचानक तिथे गेली आणि मग मुलोही निघून गेली. त्यांचा मुलगा ज्युनियर फुटबॉल संघासाठी खेळतो आणि मुलगी पियानो आणि जिम्नॅस्टिक शिकत आहे. दरम्यान, ‘केजीएफ चॅप्टर 2’ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान संजय दत्तने सांगितले होते की, जेव्हा त्याला कॅन्सर झाल्याचे समजले तेव्हा तो तासनतास रडायचा. त्याने सांगितले होते, ‘तो चौथ्या स्टेजच्या फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त होता.