नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक – मुंबई महामार्गावर पंढरपुरवाडी भागात टांग्याला व मोटार सायकलला एका भरधाव आयशरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात बोरटेंभे येथील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. प्रभाकर सुधाकर आडोळे (२५) कुशल सुधाकर आडोळे (२२) व रोहित भगीरथ आडोळे (१९) हे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. शहर बायपासच्या सह्याद्रीनगरजवळ मंगळवार रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घाटनदेवी येथून बोरटेंभेकडे जाणाऱ्या टांग्याला व मोटार सायकलला आयशरने जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या घटनेनंतर आयशर चालक फरार झाला आहे. या अपघातानंतर इगतपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी वाहनचालकाचा शोध घेत आहे.