बुधवार, सप्टेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

साखर कारखान्यांची लॉटरी… तब्बल इतक्या हजार कोटींची गुंतवणूक… सरकार देणार ही सुविधा… बँकांकडून मिळणार या दराने कर्ज…

by Gautam Sancheti
मार्च 7, 2023 | 12:39 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
suger factory

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठण्यासाठी, साखर कारखाने आणि मद्य निर्मिती कंपन्यांना क्षमता वाढविण्यास सरकार प्रोत्साहन देत आहे. यासाठी सरकारने त्यांना बँकांकडून कर्ज मिळवून देण्याची सुविधा दिली आहे. यासाठी व्याज दर ६ टक्के किंवा बँका आकारत असलेल्या व्याजाच्या ५० टक्के, यापैकी जे कमी असेल ते सरकार कडून दिले जाईल. यामुळे साखर क्षेत्रात जवळपास ४१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.

यात महत्वाचे ही आहे, की साखरेपासून इथेनॉल उत्पादन आणि साखर निर्यात केल्याने, अनेक साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे आणि याचा परिणाम म्हणून, शेतकऱ्यांची उसाची देणी वेळेत देण्यात आली आहेत. साखर हंगाम २०२१-२२ मध्ये साखर कारखान्यांनी १.१८ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त उस खरेदी केली आणि या हंगामात केंद्र सरकारचे अनुदान न घेता १.१७ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त देणी चुकती केली. म्हणून साखर हंगाम २०२१-२२ मध्ये उसाची देणी ५०० कोटींपेक्षा कमी आहेत, याचा अर्थ असा आहे की साखर हंगाम २०२१-२२ साठीची उसाची ९९.७ टक्के देणी आधीच चुकती करण्यात आली आहेत आणि आधीच्या हंगामाची ९९.९ टक्के देणी चुकती करण्यात आली आहेत, हा एक विक्रम आहे.

साखर क्षेत्र स्वयंपूर्ण होण्यासाठी एक दूरगामी उपाय म्हणून केंद्र सरकार साखर कारखान्यांना साखरेपासून इथेनॉल उत्पादन करण्यास आणि जास्तीची साखर निर्यात करण्यास प्रोत्साहन देत आहे, जेणेकरून उस उत्पादकांना त्यांची देणी वेळेत देता येतील आणि कारखान्यांची आर्थिक स्थिती देखील उत्तम राहील. या दोन्ही उपायांना यश आले आहे आणि साखर गळीप हंगाम २०२१-२२ नंतर कुठलेही अनुदान न घेता आता साखर क्षेत्र स्वयंपूर्ण झाले आहे.

ऑक्टोबर – सप्टेंबर २०२२-२३ या साखर हंगामात भारतात इथेनॉल उत्पादनासाठी सुमारे ५० लाख मेट्रिक टन डायव्हर्शन सह ३३६ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. तर, देशातील एकूण सुक्रोस उत्पादन ३८६ लाख मेट्रिक टन असणार आहे. हे गेल्या वर्षीच्या ३९५ लाख मेट्रिक टनच्या तुलनेत थोडे कमी आहे (३५९ लाख मेट्रिक टन + ३६ लाख मेट्रिक टन इथेनॉल उत्पादन) मात्र गेल्या पाच वर्षातील दुसरे सर्वाधिक आहे. साखर उत्पादनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत या हंगामात साखर उत्पादन कमी झाले आहे, कारण सप्टेंबर – ऑक्टोबर २०२२ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे उस उत्पादन कमी झाले. मात्र, तामिळनाडू सारख्या काही राज्यांत यंदा मागच्या वर्षीपेक्षा जास्त उत्पादन झाले आहे. अशा प्रकारे एकूण सुक्रोस उत्पादन २०२१-२२ च्या साखर हंगामापेक्षा ३ टक्के कमी राहण्याची शक्यता आहे.

साखरेची देशांतर्गत गरज जवळपास २७५ लाख मेट्रिक टन आणि निर्यात जवळपास ६१ लाख मेट्रिक टन लक्षात घेता, यात ७० मेट्रिक टनचा फरक तीन महिने देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यास पुरेसा आहे. त्यामुळे देशांतर्गत वापरासाठी पुरेशी साखर योग्य दरात वर्षभर उपलब्ध राहणार आहे.सरकारच्या व्यवहार्य धोरणामुळे देशात साखरेच्या किमतीत अतिशय कमी वाढ झाली आहे. जगभरात साखरेच्या दरात विक्रमी वाढ झालेली असताना आणी ते कमी होण्याची कुठलीच चिन्हे दिसत नसताना, भारतात साखरेचे दर स्थिर आहेत हे लक्षणीय आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अवघ्या एक रुपयात तब्बल ३९ वर्षे रुग्णसेवा… पद्मश्री डॉ. रवींद्र व डॉ. स्मिता कोल्हे यांना भेटण्यासाठी येथे नक्की या…

Next Post

फार्मसी क्षेत्रात जॉब हवा आहे? तातडीने येथे भेट द्या

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Chandrashekhar Bawankule
महत्त्वाच्या बातम्या

आता ओबीसींच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती

सप्टेंबर 3, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

या मार्गावर सुरू होणार रेल्वे…असा असेल रेल्वे मार्ग

सप्टेंबर 3, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोडींमध्ये सव्वा चार लाख रूपयाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

सप्टेंबर 3, 2025
rohit pawar
संमिश्र वार्ता

सरकारने केवळ दोन समाजात वाद निर्माण करुन सत्तेची पोळी भाजली…रोहित पवार यांचा आरोप

सप्टेंबर 3, 2025
crime1
क्राईम डायरी

तब्बल सव्वा सतरा लाखाला गंडा…अशी केली फसवणूक

सप्टेंबर 3, 2025
mantralya mudra
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय

सप्टेंबर 3, 2025
manoj jarange e1706288769516
महत्त्वाच्या बातम्या

किडे मकोडयांचं ऐकू नका, राईट काम होणार…मनोज जरांगे पाटील

सप्टेंबर 3, 2025
IMG 20250903 WA0169
राज्य

राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे राज्यातील आरोग्य सेवा ठप्प

सप्टेंबर 3, 2025
Next Post
image0044S5B

फार्मसी क्षेत्रात जॉब हवा आहे? तातडीने येथे भेट द्या

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011