अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिकच्या आदिवासीबहुल सुरगाणा तालुक्यातील भेगू सावरपाडा येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. रस्ता नसल्याने चक्क विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्यासाठी केटीवेअर बंधाऱ्यावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यातुन कसरती करत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. कळमणे, बेगू ,सावरपाडा, मदळपाडा, खिरमाणी आदी गावातील विद्यार्थ्यांची दररोज अशीच अवस्था आहे. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होताना दिसून येत आहे. या प्रकारामुळे एखादी घटना जीवावर बेतू शकते याला जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. शासनाने योग्य ती दखल घेऊन या ठिकाणी पूल बांधावा अशी मागणी पालकांसह, ग्रामस्थानी केले आहे.