बुधवार, सप्टेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – दर्पण – कांदा अन् धाडसत्र

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 16, 2020 | 1:12 am
in इतर
0
kanda

कांदा अन् धाडसत्र

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यानंतर प्राप्तिकर विभागाने कांदा व्यापा-यांवर छापे टाकले. त्यामुळे सरकारच्या या एकूण धोरणामुळे कांदा व्यापारी व शेतक-यांमध्ये तीव्र संताप आहे. व्यापा-यांवर धाडी टाकल्या तर त्याचा थेट परिणाम हा भावावर  होत असतो. त्यामुळे गेल्या वेळी अशा धाडीविरोधात व्यापारी व शेतक-यांनी प्राप्तिकर विभागाविरुध्द दंड थोपटले होते. आताही तशीच काहीशी स्थिती आहे.

gautam sancheti
गौतम संचेती
(लेखक इंडिया दर्पणचे संपादक आहेत)

केंद्र सरकारचे एकंदरीतच कांदा आणि शेतकऱ्यांविषयीचे नक्की धोरण काय आहे, अशी शंका निर्माण व्हावी अशी स्थिती आहे. कांद्याचे दर वाढून बिहार विधानसभेच्या निवडणुकीत त्याचे पडसाद उमटायला नको म्हणून केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लादली. हो लादलीच. जी अतिशय चुकीची आहे. त्याचा थेट परिणाम कांदा उत्पादकांवर झाला. उत्पादन खर्चही निघणार नाही अशी स्थिती आली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. त्यातच भर म्हणून की काय काही दिवसांनी केंद्र सरकारने केवळ बंगळुरू आणि कृष्णपुरम या कांद्यावरील बंदी उठवून निर्यातीला परवानगी दिली. म्हणजेच केंद्र सरकार दुजाभाव करीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढतच आहे. आणि आता प्राप्तिकरच्या माध्यमातून कांदा व्यापाऱ्यांवर छापासत्र सुरू झाले आहे. त्यामुळे संशयाला मोठी जागा आहे.

बिहारच्या विधानसभा निवडणुकीत कांद्याचा विषय डोकेदुखी ठरु नये म्हणून सरकारचे हे दबावतंत्र असले तरी त्याचा फटका शेतक-यांना बसत आहे. भाजपने कांद्यामुळे तीन राज्य गमावले होते. त्यामुळे बिहारच्या निवडणुका हातातून जाऊ नये म्हणून कांदा उत्पादक शेतक-यांचा बळी दिला जात असल्याची भावना शेतक-यांमध्ये बळावली आहे.

कांद्याचे दर कोसळले की त्याकडे सरकार दुर्लक्ष करते, पण, भाव वाढले की सरकारला जाग येते. त्यामुळे अशा सरकारच्या धोरणाविरुध्द शेतक-यांना आवाज बुलंद करावा लागणार आहे. अगोदरच कोरोनाचा मार कांदा उत्पादक शेतक-यांना मोठ्या प्रमाणात बसला. त्यात व्यवहार सुरळीत होत नाही तोच निर्यातबंदी आली. त्याचाही फटका शेतक-यांना चांगला बसला.

कांदा व्यापा-याला तशा या धाडी नवीन नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून तशी कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. पण, व्यापा-यांना जेरीस आणले की त्याचा थेट फटका भावावर होतो, हे शेतक-यांना कळते. त्यामुळे शेतकरी संतापले आहेत. प्राप्तिकर खात्याने गेल्या वेळी अशाच धाडी घातल्या. पण, त्याचे पुढे काय झाले याची माहिती समोर आली नाही. त्यामुळे या धाडीमागील उद्देश व कारवाई गुलदस्त्यात राहते. नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनात देशामध्ये अग्रेसर आहे. कांद्याचे भाव कोसळले की येथे पहिली प्रतिक्रीया उमटते व देशाचे लक्ष या जिल्ह्याकडे लागते. कांदा डोळ्यातून जसा पाणी आणतो. तसा तो सरकारलाही चांगलाच रडवतो. म्हणून सरकारही आता सजग झाले आहे. कांद्याचा विषय आला की तो अंगावर येऊ नये म्हणून विविध प्रकराच्या क्लृप्त्या केल्या जातात. आताही त्यांनी तेच केले आहे. भाजपचे सरकार असतांना कांद्याच्या दरवाढीमुळे तीन राज्यांचे सरकार हातचे गेले होते. त्यामुळे कांद्याच्या विषयावर सरकार अत्यंत संवेदनशील असते. पण, ही संवेदनशीलता भाव कोसळल्यानंतर राहत नाही. त्यामुळे सरकारचे धोरण हे शेतकरी विरोधी असल्याची भावना बळावते.

जगभरात १७५ देशांत कांदा पिकवला जातो. यात भारत, व्यतिरिक्त चीन, अमेरिका, पाकिस्तान, तुर्कस्तान, हे प्रमुख आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि शेती संघटनेने केलेल्या सर्वेक्षणानुसार जगातील ६७ लाख एकरमध्ये पाच कोटी टन कांद्याचे उत्पादन घेतले जाते. भारतात दोन लाख पाच हजार एकरमध्ये ५० लाख टन कांदा पिकवला जातो. भारतात तामिळनाडू, राजस्थान, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरातमध्येही कांद्याचे पीक घेतले जाते. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा पिकवला जातो. त्यात धुळे, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. पण, राज्यातील ५५ टक्के कांद्याचे उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात घेतले जाते.

असा हा कांदा निर्यातीतून देशाला कोट्यावधी रुपयाचे परदेशी चलन मिळून देतो. पण, तरी त्यांच्यावर संकट येत असतात. त्यामुळे कांदा उत्पादक व व्यापा-यांनी सरकारला टाळ्यावर आणण्याची नीति सुध्दा मिळून करणे गरजेचे आहे. अनेक वस्तूंचे जेव्हा भाव वाढतात. त्यावेळेस सरकार त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करते. पण, कांद्याबाबत तसे होत नाही. त्यामुळे या प्रश्नावर जोपर्यंत आरपार संघर्ष होत नाही. तोपर्यंत असे छापे व दबावतंत्र चालूच राहणार हे मात्र वास्तव आहे.

सदर लेखमाला

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रंजक गणित – कोडे क्र ३० (सोबत कोडे क्र २८चे उत्तर)

Next Post

हो, चक्क शंभर दशलक्ष वर्षानंतर जागे झालेले जिवाणू!

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तान क्रिकेट संघाने थेट आशिया कपमधून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय

सप्टेंबर 17, 2025
Untitled 23
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये महाराष्ट्र चेंबरतर्फे शनिवारी शासकीय योजना आणि व्यवसायाच्या संधी विषयावर सेमिनार…

सप्टेंबर 17, 2025
mukt
संमिश्र वार्ता

महाज्ञानदीप’ पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू

सप्टेंबर 17, 2025
crime 88
क्राईम डायरी

दुमजली माडीचे कौले काढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 17, 2025
accident 11
क्राईम डायरी

गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून दांम्पत्य पडले…६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 17, 2025
crime114
क्राईम डायरी

कर्जदारास बंदुकीचा धाक दाखवून सावकाराने केले अपहरण…व्याजासह मुद्दल परत करुनही घडला प्रकार

सप्टेंबर 17, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
संमिश्र वार्ता

राज ठाकरे यांनी अमित शाह, जय शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून केला हल्लाबोल…

सप्टेंबर 17, 2025
e vidhya 1024x275 1 e1758078658915
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या

सप्टेंबर 17, 2025
Next Post
IMG 20201015 WA0024

हो, चक्क शंभर दशलक्ष वर्षानंतर जागे झालेले जिवाणू!

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011