अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
देशात सर्वत्र ‘ आजादी का अमृत महोत्सव ‘ या योजनेअंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन देशपातळीवर करण्यात आल्यानंतर या आवाहनाला प्रतिसाद देत या मोहिमेत देशवासीय सहभागी झाले आहे..आज नाशिकच्या नांदगाव येथील जामा मस्जिद ( मरकज ) येथे नमाजावेळी तमाम मुस्लिम बांधवांना प्रत्येक घरावर, दुकानावर तिरंगा लावण्याचे आवाहन केले..मौलाना मुफ्ती मोहम्मद फईम यांनी यावेळी प्रबोधन करतांना देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी बलिदान दिलेल्या शहिदांचे स्मरण करून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखत ‘ आजादी का अमृत महोत्सव ‘ उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले.. नमाज पठनानंतर प्रत्येक मुस्लिम बांधवांना राष्ट्रध्वज वाटण्यात आले..