इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लहान मुलांची खूप काळजी घ्यावी लागते. आई-वडील, पालक किंवा आजी-आजोबा यांचे थोडे जरी दुर्लक्ष झाले तर लहान बालके काही करून घेतात. त्यामुळे आपघात होऊन त्यांच्या जीवावर देखील बेतू शकते अशीच एक घटना मात्र मध्य प्रदेशात घडली यामध्ये एका लहानग्याचा बळी पडून अंत झाला.
हबीबगंज येथील शिवाजी नगर वस्तीतील नोकर क्वार्टरमध्ये खेळत असताना १८ महिन्यांचा मुलगा बादलीत पडला. तो बेशुद्ध दिसताच आई त्याला घेऊन जयप्रकाश रुग्णालयात गेली. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीतच निष्पापला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच तेथे पोहोचलेल्या पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या प्रकरणी पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी नगर येथील शिवाजीनगरमध्ये राहणारा आशाराम हा हातगाडीवर छोटा विक्री व्यवसाय चालवतो. त्यांच्या कुटुंबात धाकटा मुलगा दीपक हा १८ महिन्यांचा आहे. काही कामासाठी आशाराम बाहेर पडल्याने. त्याच्या घरी पत्नी आणि दोन मुले होती. दुपारी पत्नी आणि मोठा मुलगा घरी टीव्ही पाहत होते. दरम्यान, दीपक खेळता खेळता बाहेर आला. भर उन्हात त्याला अंगणात पाण्याने भरलेली बादली दिसली आणि तो त्यात खेळू लागला.
बराच वेळ आईला तो दिसला नाही, तेव्हा ती त्याला बघायला बाहेर आली. यावेळी तिला या बालकाचे दोन्ही पाय वरच्या बाजूला, तर तोंड पाण्यात बुडलेले दिसले. तिने तात्काळ त्याला बादलीतून बाहेर काढून रुग्णालयात नेले, तेथे प्राथमिक तपासणीतच डॉक्टरांनी दीपांशूला मृत घोषित केले. अपघातात मुलाला गमावल्यानंतर आईची प्रकृती खालावली आहे. तिचे कुटुंबिय आता तिची काळजी घेत आहेत.