भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर, सरचिटणीस नंदकुमार खैरनार यांनी दिली माहिती
कळवण – ठाकरे आघाडी सरकारने ७५ लाख वीज ग्राहकांना, ४५ लाख शेतक-यांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप केले आहे.म्हणून ठाकरे आघाडी सरकारच्या निषेधार्थ शुक्रवार २४ फेब्रुवारी रोजी भाजपाने राज्यभर “जेल भरो व हल्लाबोल“ आंदोलन आयोजित केले आहे अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष केंदा पाटील आहेर, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खैरनार यांनी दिली.
