नवी दिल्ली – येत्या १ एप्रिलपासून हवाई प्रवास महागणार आहे. कारण नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान प्रवाश्यांसाठी ४० रुपयांची वाढ केली आहे. हवाई तिकिटांमध्ये विमानतळ सुरक्षा शुल्क (एएसएफ) वाढविण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय विमान प्रवाश्यांसाठी विमानतळाची सुरक्षा फी ११४ रुपये असेल. तर आता देशातील स्थानिक प्रवाशांकडून विमानतळ सुरक्षा फीसाठी २०० रुपये आकारले जातील.
आंतरराष्ट्रीय प्रवाशांना १२ डॉलर शुल्क द्यावे लागतील. हे नवीन दर १ एप्रिलपासून लागू होतील. विमानतळाच्या सुरक्षिततेसाठी विमानतळाची सुरक्षा शुल्क प्रत्येक प्रवाश्याकडून आकारले जाते, परंतु काही प्रवाश्यांना यातून सूट देण्यात आली आहे. यामध्ये २ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुले, डिप्लोमॅटिक पासपोर्ट असणारे अधिकारी, ड्युटी एअरलाइन्सच्या क्रू आणि एकाच विमान तिकिटाद्वारे पहिल्या विमानाच्या २४ तासांच्या आत दुसर्या कनेक्टिंग विमानाने प्रवास करणार्या प्रवाशांचा समावेश आहे. विमानतळ सुरक्षा शुल्क दर सहा महिन्यांनी सुधारित केले जाते. सप्टेंबर २०२० मध्ये विमानतळाची सुरक्षा फी १५० रुपयांवरून १६० रुपये करण्यात आली होती.