शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हो, या गावाचे नाव बदलले आहे तब्बल ८ वेळा!

by Gautam Sancheti
डिसेंबर 20, 2020 | 5:45 am
in महत्त्वाच्या बातम्या
0

लखनऊ – उत्तर प्रदेशचे मुख्यमत्री योगी आदित्यनाथ यांचे गाव असलेले गोरखपूर सध्या चर्चेत आहे. मात्र गोरखपूर हे नाव या गावाला सहज प्राप्त झालेले नाही. गेल्या २६०० वर्षांमध्ये तब्बल ८ वेळा या गावाचे नाव बदलले आहे. तशी इतिहासात नोंद आहे.
सध्याचे २१७ वर्षांपासून
प्राचीन भारताच्या इतिहासकारांच्या मते गोरखपूर चे नाव कधीकाळी रामग्राम असे होते. कालांतराने जगाला योगाचा परिचय करवून देणाऱ्या गुरु गोरक्षनाथांच्या नावावरून या शहराचे नाव गोरक्षपूर आणि पुढे गोरखपूर झाल्याचे तज्ञ सांगतात. सध्याचे गोरखपूर हे नाव गेल्या २१७ वर्षांपासून असल्याचे समजते.
गोरक्षपूर
याआधी नवव्या शकतातसुद्धा या शहराला गुरु गोरक्षनाथ यांच्या नावाने ‘गोरक्षपूर’ असे ओळखले जायचे. यानंतर जसजसे या शहराचे शासक बदलत गेले, तसतसे शहराचे नावही बदलत गेले. कधी या शहराला सूब-ए-सर्किया तर कधी अख्तनगर, कधी गोरखपुर सरकार तर कधी मोअज्जमाबाद या नावाने हे शहर ओळखले गेले. अंतत: ब्रिटीश शासकांनी सन १८०१ मध्ये या याशाराचे नाव ‘गोरखपुर’ असे ठेवले जे नवव्या शतकातील त्याच्या ‘गोरक्षपुर’ या नावाशी साधर्म्य असणारे आहे.
वेगवेगळी नावे
सर्की शासकांच्या काळात या शहरास सुब-ए-सर्कीया या नावे ओळखले जायचे. औरंगजेबाच्या शासन काळात (1658-1707) गोरखपूर चे नाव मोअज्जमाबाद असे झाले होते. औरंगजेबा चा मुलगा मोअज्जम या भागात शिकारीसाठी आला असता या शहरात काही काळ वास्तव्यास होता. त्याच्याच नावावर शहरास मोअज्जमाबाद असे नाव पडले.
2018033037 1024x679 1
रामग्राम राजधानी
गोरखपूर विद्यापीठाच्या प्राचीन इतिहास विभागाचे पूर्व प्रमुख प्रा.राजवंत राव यांनी सांगितले की आज गोरखपूर मध्ये ज्या ठिकाणी रामगढ तलाव आहे त्या ठिकाणी २६०० वर्षे आधी रामग्राम नावाचे गाव होते. ही कोळी लोकांची राजधानी होती. भौगोलिक आपत्ती आल्यामुळे हे गाव भूमीमध्ये समाविष्ट झाले आणि त्या ठिकाणी तलाव तयार झाला. चंद्रगुप्त मौर्याच्या शासनकाळात गोरखपूरला पिप्पलीवन या नावाने ओळखले जायचे. गुरु गोरक्षनाथ यांच्या प्रभावाने नवव्या शतकात हे नाव बदलून गोरक्षपूर झाले.
कधी होते कोणते नाव? 
रामग्राम – इसविसन पूर्व सहावे शतक
पिप्पलीवन – इसविसनपूर्व तिसरे शतक
गोरक्षपुर – नवे शतक
सूब-ए-सर्किया – १३वे आणि १४ वे शतक
अख्तरनगर – १४ व्या शतकानंतर काही काल
गोरखपूर सरकार – १७ व्या शतकाच्या पूर्वी काही काळ
मोअज्जमाबाद – १७ व्या शकतात मुघल काळात
गोरखपूर – १८०१ पासून ते आजतागायत
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रक्तदाब नियंत्रित करायचाय? या ५ गोष्टी लक्षात ठेवा…

Next Post

कळवण-सुरगाणा मतदारसंघातील शिवसेना महिला आघाडीचा संयुक्तिक मेळावा संपन्न

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20201220 WA0007

कळवण-सुरगाणा मतदारसंघातील शिवसेना महिला आघाडीचा संयुक्तिक मेळावा संपन्न

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी मतभेदांचे प्रसंग टाळावे, जाणून घ्या, शनिवार, ९ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 8, 2025
IMG 20250808 WA0420 1

अपघातग्रस्त शाळकरी विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले शालेय शिक्षण मंत्री

ऑगस्ट 8, 2025
IMG 20250808 WA0425 2

महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुरक्षित, एकाचा शोध सुरू. उत्तरकाशीत अडकलेल्या पर्यटकांशी मंत्री गिरीश महाजन यांचा संवाद

ऑगस्ट 8, 2025
IMG 20250808 WA0395 1

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले हे निर्देश

ऑगस्ट 8, 2025
INDIA GOVERMENT

टोमॅटो, कांदा आणि बटाट्याच्या किमती स्थिर राहाव्यात यासाठी केंद्र सरकार सक्रिय…केल्या या उपाययोजना

ऑगस्ट 8, 2025
ग्राम विकास मंत्री व सार्वजनिक आरोग्य मंत्री संयुक्त बैठक 2 1024x682 1 e1754659804441

या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी कार्यवाही करण्याचे मंत्र्यांचे निर्देश…

ऑगस्ट 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011