बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वात इंडिया बांबू फोरमची स्थापना

ऑक्टोबर 3, 2020 | 2:00 pm
in राष्ट्रीय
0

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत बांबू या पिकाचा मोठा सहभाग असणार आहे. बांबू नव्या भारताच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असे मत महाराष्ट्र राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केले.यासाठी माजी मंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वात इंडिया बांबू फोरमची स्थापना करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

फोरमचा ऑनलाइन शुभारंभ नवी दिल्लीतून संपन्न झाला. त्यावेळी पाशा पटेल बोलत होते.माजी मंत्री सुरेश प्रभू, दिल्ली आयआयटीचे  प्रा. डॉ. सुप्रतिक गुप्ता, महाराष्ट्र बांबू  प्रमोशन फाऊंडेशनचे  मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही गिरिराज, मणिपाल युनिव्हर्सिटीचे संचालक मधुरा यादव,कॉनबॅकचे संस्थापक संचालक संजीव करपे, मुकेश गुलाटी आदींची यावेळी उपस्थिती होती.

   या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये बोलताना पाशा पटेल यांनी सांगितले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता बांबू या विषयात पुढाकार घेतला आहे. त्याला नितीन गडकरी आणि आता सुरेश प्रभू यांची जोड मिळाली आहे.आत्मनिर्भर भारताची उभारणी करताना बांबूचा सहभाग महत्त्वाचा असणार आहे. देशाच्या विकास चळवळीचा बांबू हा मानबिंदू ठरणार आहे. बांबू लागवडीमुळे जंगलतोड कमी होऊन पर्यावरण वाचवता येऊ शकते. बांबूच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे शक्य असून त्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. यासाठी हा बांबू फोरम आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संस्थांना जोडून तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान केले जाणार असल्याचे पाशा पटेल म्हणाले.

   त्यांनी सांगितले की,या फोरम अंतर्गत बांबू क्षेत्राशी निगडित असणाऱ्या देशभरातील ५०  व्यक्तींना संघटित करण्यात आले आहे. ही मंडळी बांबू क्षेत्राच्या विकासासाठी सामाजिक दायित्व म्हणून आपला वेळ खर्च करून हरित अर्थशास्त्रात मोलाची कामगिरी पार पडणार आहेत. देशातील बांबू क्षेत्रातील सर्व भागीदार व आंतरराष्ट्रीय संस्था यांच्यासोबत हा फोरम धोरणात्मक बदलासाठी काम करणार आहे.

   पाशा पटेल म्हणाले की, मागील २० वर्षांपासून देशातील बांबू क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खऱ्या अर्थाने त्याला गती दिली. त्यांनी बांबूला झाड या व्याख्येतून गवत ही व्याख्या मिळवून दिली. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हेदेखील बांबू क्षेत्राच्या वाढीसाठी आग्रही आहेत.त्यांनी बांबूपासून इथेनॉल ,शेडनेट व फर्निचर तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये वनमंत्री असणारे सुधीर मुनगंटीवार यांनी बांबू संदर्भातील कामांना वेग दिला. चिचपल्ली (चंद्रपूर) येथे बांबू रिसर्च सेंटरची १०० कोटी रुपयांची बांबूपासून तयार केलेल्या इमारतीची उभारणी केली.आजपर्यंत या क्षेत्राची ताकद पूर्णपणे वापरता आली नाही. या क्षेत्रात काम करणाऱ्या घटकांना क्रियाशील घटकांशी जोडले जाणार आहे.

   वास्तुविशारद, अभियंता, निर्मितीकार, डिझायनर प्रशिक्षण संस्था ,संशोधन संस्था, वित्तीय संस्था, यंत्रसामुग्री निर्माते यांना परस्परांशी सोडून साखळी निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.

  पाशा पटेल यांनी सांगितले की, बांबूवर आधारित राज्य व राष्ट्रीय पर्यावरणात्मक परिणामांना लक्ष करणे हा या फोरमचा उद्देश आहे. बांबू क्षेत्राचे ज्ञान देणारे पोर्टल निर्माण करणे, तांत्रिक मानांकन निश्चित करणे, उद्योजकांसाठी पाठीराखा म्हणून काम करणे तसेच उत्पादक व खरेदीदार यांच्यातील दुवा म्हणून हा फोरम काम करणार आहे.

  त्यांनी सांगितले की ,आज पर्यावरण बदलत असताना बांबूमुळे वनक्षेत्र वाढू शकते.याशिवाय बांबू लागवडीतून शेतकऱ्यांना उसापेक्षाही अधिक उत्पन्न मिळू शकते. कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे हे पीक असून या माध्यमातून शंभर वर्षापर्यंत खात्रीशीर उत्पन्न मिळते, अशी माहितीही पाशा पटेल यांनी यावेळी बोलताना दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बघा, कर्नाळा किल्ला व सुळक्याचा ड्रोन व्ह्यू (व्हिडिओ)

Next Post

गुडन्यूज. नाशिक-येवला रस्ता होणार काँक्रीटचा; जागतिक बँकेने दिला निधी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Paytm Gold Coin
संमिश्र वार्ता

पेटीएमवर प्रत्येक पेमेंटमधून मिळवा गोल्ड कॉइन

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
IMG 20201003 WA0014

गुडन्यूज. नाशिक-येवला रस्ता होणार काँक्रीटचा; जागतिक बँकेने दिला निधी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011